क्षयरोग मुक्तीसाठी बीसीजी लसीकरण सुरू

Share

मुंबई (खास प्रतिनिधी): क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी डिसेंबर २०२४ पासून इन मुंबईतील १२ इंटरव्हेन्शनल विभागांमध्ये आयसीएमआरच्या सहकार्यान प्रौद्ध बीसीजी लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. मार्च २०२५ पर्यंत १६ हजार ७३५ लाभाव्यांना बीसीजी लसीकरण देण्यात आले आहे.

जागतिक क्षयरोग दिन २०२५ वर्षांसाठीचे घोषवाक्य “होषा आपण टीवी निश्चित संपपू शकतोः प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा या है आहे. ननीकच्या काळात प्रकाशित अहवालानुसार, मुंबईमध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांचा यशाचा दर ८० टक्के आहे, जो गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला आहे. हे गुणवत्ताधारित निदान सेवेमध्ये सातत्याने सुधारणा, नवीन औषध उपचार पद्धती आणि महापालिका आरोग्य विभागाने डिआरटीबी रुग्णांना प्रदान केलेल्या मार्गदर्शन व सहाम्यामुळे शक्य झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ‘टीबी मुक्त विभाग’ आणि ‘टीबी मुक्त मुंबई हे ध्येय साध्य करण्यासाठी टीबीमुक्त मुंबई मोहिमेंतर्गत कृती आराखडा तयार क्षयरोगाची १० प्रमुख मुक्त भारत विभागनिहाय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा विभागनिहाय पातळीवर सज्ज झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये, मुंबईमध्ये एकूण ६० हजार ६३३ क्षयरोगाचे रुग्ण आढळले, त्यापैकी ५३ हजार ६३८ भवरोगाचे रुग्ण मुंबईत वास्तव्यात होते. एकूण रुग्णांपैकी ३८ टक्के हे फुप्फुसा व्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आणि ६ टक्के बालरुग्ण होते. तर ९ टक्के हे औषध-प्रतिरोधक रुग्ण होते. केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचना आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ विभागांमध्ये ७ डिसेबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यंत ‘१०० दिवसांची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट समरोगाच्या रुग्णांचा शोध घेण्याचा वेग वाढवणे, भ्रषरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट करणे आणि नवीन रुग्ण टाळण्यासाठी क्षयरोगाचा प्रसार रोखणे हे आहे.

मोहिमेअंतर्गत १५ लाखांहून अधिक उच्ब जोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण लक्षणे : २ आठवडयांहून अधिक कालावधीचा खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, दम लागणे, खोकताना रक्त येणे, थकना आणि मानेवर गाठ येणे अशी आहेत. वरील लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या बीएमसी दवाखान्यात मोफत तपासणी करावी, असे आवाहन बृहन्मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्गा अधिकारी डॉ. दक्षा शहा यानी केले आहे. करण्यात आले असून, त्यामध्ये “Presumptive TB (संभाव्य टीबी) रुग्णांसाठी तपासणी करण्यात आली आहे. ६०,९४४ NAAT चाचण्या पार पडल्या असून निदानासाठी मोबाइल एक्स-रे व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago