Noida Breaking News : गायीच्या दुधामुळे महिलेचा मृत्यू

  59

नोएडा : उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध प्यायल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील जेवरमधील थोरा गावातील एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेचा तपास केल्यानंतर निष्पन्न झालेल्या माहितीत असे आढळून आले की दूध सेवन केलेल्या गायीला रेबीज झाला होता. दूध देण्याच्या काही दिवस आधी या गायीला कुत्रा चावला होता. त्यामुळे गायीच्या शरीरात विष पसरले. गायीची प्रकृती ढासळत होती. त्यातच दोन महिन्यापूर्वी तिने वासराला जन्म दिला. परंपरेनुसार, गायीचे पहिले दूध गावात वाटले गेले. गायीची प्रकृती अधिक खराब होऊ लागल्यानंतर पशु चिकित्सककडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गायीला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गायीचे दूध पिणाऱ्यांना रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.


गायीच्या मालकिणीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजेक्शन घेतलं. पण शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा यांनी इंजेक्शन घेतलं नाही. काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार, सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.