IPL 2025: अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईचा विजय

  67

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संघाने बाजी मारली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १५६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १५८ धावा करत सामना जिंकला. चेन्नईने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.


चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५३ धावा तडकावल्या. त्याने यावेळी ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सुरूवातीला चेन्नई मुंबईने दिलेले हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते मात्र त्यांच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. शेवटच्या ८ बॉलमध्ये ४ धावा हव्या असताना एमएस धोनी मैदानात आला. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. रचिन रवींद्रने विनिंग षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.


सामन्यात मुंबईची सुरूवात खराब राहिली होती. कर्णधार रोहित शर्मा न खेळता पहिल्याच षटकात बाद झाला होता. यानंतर मुंबईने सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र सातत्याने अंतराने विकेट पडत गेले आणि संघाला केवळ दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.


मुंबईने ९ विकेट गमावत १५५ धावा केल्या. संघासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. अखेरीस दीपक चाहरने १५ बॉलमध्ये २८ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला २० चा आकडा पार करता आला नाही. स्पिनर नूर अहमदने आपली जादू दाखवली आणि ४ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट