IPL 2025: अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संघाने बाजी मारली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १५६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १५८ धावा करत सामना जिंकला. चेन्नईने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.


चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५३ धावा तडकावल्या. त्याने यावेळी ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सुरूवातीला चेन्नई मुंबईने दिलेले हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते मात्र त्यांच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. शेवटच्या ८ बॉलमध्ये ४ धावा हव्या असताना एमएस धोनी मैदानात आला. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. रचिन रवींद्रने विनिंग षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.


सामन्यात मुंबईची सुरूवात खराब राहिली होती. कर्णधार रोहित शर्मा न खेळता पहिल्याच षटकात बाद झाला होता. यानंतर मुंबईने सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र सातत्याने अंतराने विकेट पडत गेले आणि संघाला केवळ दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.


मुंबईने ९ विकेट गमावत १५५ धावा केल्या. संघासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. अखेरीस दीपक चाहरने १५ बॉलमध्ये २८ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला २० चा आकडा पार करता आला नाही. स्पिनर नूर अहमदने आपली जादू दाखवली आणि ४ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख