IPL 2025: अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संघाने बाजी मारली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १५६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १५८ धावा करत सामना जिंकला. चेन्नईने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.


चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५३ धावा तडकावल्या. त्याने यावेळी ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सुरूवातीला चेन्नई मुंबईने दिलेले हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते मात्र त्यांच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. शेवटच्या ८ बॉलमध्ये ४ धावा हव्या असताना एमएस धोनी मैदानात आला. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. रचिन रवींद्रने विनिंग षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.


सामन्यात मुंबईची सुरूवात खराब राहिली होती. कर्णधार रोहित शर्मा न खेळता पहिल्याच षटकात बाद झाला होता. यानंतर मुंबईने सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र सातत्याने अंतराने विकेट पडत गेले आणि संघाला केवळ दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.


मुंबईने ९ विकेट गमावत १५५ धावा केल्या. संघासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. अखेरीस दीपक चाहरने १५ बॉलमध्ये २८ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला २० चा आकडा पार करता आला नाही. स्पिनर नूर अहमदने आपली जादू दाखवली आणि ४ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)