मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संघाने बाजी मारली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १५६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १५८ धावा करत सामना जिंकला. चेन्नईने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५३ धावा तडकावल्या. त्याने यावेळी ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सुरूवातीला चेन्नई मुंबईने दिलेले हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते मात्र त्यांच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. शेवटच्या ८ बॉलमध्ये ४ धावा हव्या असताना एमएस धोनी मैदानात आला. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. रचिन रवींद्रने विनिंग षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.
सामन्यात मुंबईची सुरूवात खराब राहिली होती. कर्णधार रोहित शर्मा न खेळता पहिल्याच षटकात बाद झाला होता. यानंतर मुंबईने सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र सातत्याने अंतराने विकेट पडत गेले आणि संघाला केवळ दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.
मुंबईने ९ विकेट गमावत १५५ धावा केल्या. संघासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. अखेरीस दीपक चाहरने १५ बॉलमध्ये २८ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला २० चा आकडा पार करता आला नाही. स्पिनर नूर अहमदने आपली जादू दाखवली आणि ४ विकेट मिळवल्या.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…