IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स...कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR उद्ध्वस्त

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२५चा पहिला सामना २२ मार्चला शनिवार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने सात विकेटनी विजय मिळवला. आरसीबीच्या विजयात कृणाल पांड्या, फिल साल्ट आणि विराट कोहली यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीने कहर केला. तर साल्ट आणि कोहलीने फलंदाजीमध्ये केकेआरच्या गोलंदाजांना धुतले.



नरेनच्या विकेटनंतर अडखळली केकेआर


ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एकवेळेस मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. त्यांचा स्कोर ९.५ षटकांत एक विकेट बाद १०७ इतका होता. तेव्हा असे वाटत होते की केकेआर २००चा टप्पा गाठेल. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी चौकार-षटकारांचा पाऊस सुरू ठेवला होता. दरम्यान, त्यानंतर खेळ पूर्णपणे पालटला. कृणालच्या फिरकीसमोर केकेआरचे काही चालेना. त्यांचे विकेट पडण्यास सुरूवात झाली. यामुळे केकेआर बॅकफूटवर आली. केकेआरला आरसीबीसमोर १७५ धावांचे आव्हान दिले.


१७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. १७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. तेही रात्रीच्या वेळेस मैदानावर ओस पडत असताना. केकेआरला सुरूवातीला विकेट्सची आशा होती. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून केकआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी ५१ बॉलवर ९५ धावांची भागीदारी झाली.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून