Devendra Fadnavis : 'दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार'

नागपूर : महाल आणि हंसापुरी भागात १७ मार्च रोजी झालेल्या दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. यानंतर दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई म्हणून पैसे वसूल केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जर आरोपी पैसे देऊ शकले नाहीत तर त्यांची मालमत्ता विकून नुकसान भरुन काढले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना भरपाई दिली जाईल, मात्र ही रक्कम दंगलखोरांकडून वसूल केली जाईल. त्यांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करुन लिलाव केला जाईल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



नागपुरात जे काही घडले ते पूर्णपणे पूर्वनियोजित होते. ही अचानक घडलेली घटना नव्हती. सरकार यावर कठोर कारवाई करणार आहे. दंगलीत ज्यांची वाहने, दुकाने, घरे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले त्यांना राज्य सरकार भरपाई देणार आहे. हे पैसे सरकार दंगलखोरांकडून वसूल करेल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.



नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९२ जणांना अटक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यातील १२ आरोपी अल्पवयीन असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज,मोबाईल व्हिडिओ आणि पत्रकारांनी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या मदतीने १०४ संशयितांची ओळख पटवली आहे. व्हिडीओ फूटेज आणि डिजिटल पुरावे यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. दंगलीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई होणार आहे. सोशल मीडियाद्वारे चिथावणी देणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूरमध्ये दंगल भडकवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर झाला. आतापर्यंत दंगलीकरिता चिथावणी देणाऱ्या ६८ पोस्ट ओळखण्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर अनेक पोस्टची पडताळणी सुरू आहे. ज्यांनी वातावरण बिघडवले, अफवा पसरवली आणि चिथावणी देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला त्यांनाही नागपूर दंगल प्रकरणात सहआरोपी केले जाईल. समाजात तेढ पसरवून शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दंगल करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. तसेच त्यांना न्यायालयात हजर करुन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. दंगल करणाऱ्यांनी भरपाईसाठी पैसे दिले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करुन दंडाची वसुली करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

राज्य शासनाचा भर महाराष्ट्रात कायदा - सुव्यवस्था राखण्यावर आहे. पण भविष्यात राज्यात कुठेही दंगल झाली तर भरपाईसाठी नागपूर पॅटर्न राबवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण