म्हाडा सोडतीत विजेता ठरवूनही ६५० जण घराच्या प्रतीक्षेत

मुंबई : म्हाडाच्या सोडतीमधील ६५० विजेते ठरलेले गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे या घरांचा ताबा रखडला असून विजेते आता घरासाठी म्हाडाकडे विचारणा करू लागले आहेत. म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या १३२७ घरांचादेखील समावेश होता. लॉटरी होऊन पाच महिने उलटून गेले तरी आपल्याला घर कधी मिळणार याकडे ६५० विजेते डोळे लावून बसले आहेत. यात पहाडी गोरेगाव, मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्प्लेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी को.ऑप-हौ. सोसायटी येथील विजेत्यांचा समावेश आहे. याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निर्माणाधीन इमारतींमधील अंतर्गत कामे काही प्रमाणात शिल्लक आहेत. घरांना ओसी मिळताच विजेत्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. लवकरच ओसी मिळणे अपेक्षित आहे.
Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक