Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला अटक होणार ?

मुंबई : भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार बलात्काराच्या आरोपीला आधी चौकशीसाठी अटक करतात. दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. दिशाच्या वडिलांनी केलेल्या या याचिकेत गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी होऊ शकते. जो न्याया सामान्यांना तोच न्याय माजी मंत्र्यांना आणि आमदारांना लागू आहे; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात याचिकेच्याआधारे कायद्यातील तरतुदीनुसार उचित कारवाई व्हायला पाहिजे, मंत्री नितेश राणे म्हणाले.



दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.



मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. दिशाच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिशाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी असा दावा केला होता की तिची हत्या झालेली नाही, आपल्या मुलीची बदनामी करु नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, आता त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती