Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला अटक होणार ?

मुंबई : भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार बलात्काराच्या आरोपीला आधी चौकशीसाठी अटक करतात. दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. दिशाच्या वडिलांनी केलेल्या या याचिकेत गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी होऊ शकते. जो न्याया सामान्यांना तोच न्याय माजी मंत्र्यांना आणि आमदारांना लागू आहे; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात याचिकेच्याआधारे कायद्यातील तरतुदीनुसार उचित कारवाई व्हायला पाहिजे, मंत्री नितेश राणे म्हणाले.



दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.



मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. दिशाच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिशाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी असा दावा केला होता की तिची हत्या झालेली नाही, आपल्या मुलीची बदनामी करु नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, आता त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची