Navroz 2025 : आज नवरोज...पारशी नववर्षाचा असा आहे इतिहास!

पर्शियन भाषेत 'नवीन दिवस' ​​(International Nowruz Day) म्हणजे नवरोज. आज पारशी समाज आपले नवीन वर्ष साजरे करत आहे, जो 'नवरोज' म्हणून ओळखला जातो. ज्याला मराठीमध्ये पतेती (Pateti 2025) असेही म्हणतात. पारशी धर्मियांसाठी आजचा दिवस महत्वाचाच आणि सण उत्सव या दिवशी साजरा करतात. आज घरोघरी पदार्थ बनवले जातात आणि नवीन कपडे घालून आणि घर सजवून आनंद व्यक्त करतात. हा सण पटेती आणि 'जमशेदी नवरोज' म्हणूनही ओळखला जातो.


'नवरोज' म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस म्हणजे आजच्या नवीन वर्षाला 'जमशेदी नवरोज' म्हटले जाते. कारण पारशी लोकांचे शूर योद्धा आणि पर्शियाचा राजा जमशेद यांनी पहिल्यांदाच आपल्या समाजातील लोकांना पारशी कॅलेंडरबद्दल सांगितले होते. 'नवरोज' म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस, ज्याचे संपूर्ण समाज खुल्या मनाने आणि आनंदाने स्वागत करतो. या दिवशी पारशी समाजाचे लोक मंदिरात जाऊन विशेष पूजा करतात आणि अग्नीला आपला साक्षी मानतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात.




समाजातील लोक प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. विशेष म्हणजे या दिवशी हे लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात आणि घरात चंदन ठेवतात, असे मानले जाते की असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व वाईट गोष्टी घराबाहेर जातात. लोक एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात