Navroz 2025 : आज नवरोज...पारशी नववर्षाचा असा आहे इतिहास!

पर्शियन भाषेत 'नवीन दिवस' ​​(International Nowruz Day) म्हणजे नवरोज. आज पारशी समाज आपले नवीन वर्ष साजरे करत आहे, जो 'नवरोज' म्हणून ओळखला जातो. ज्याला मराठीमध्ये पतेती (Pateti 2025) असेही म्हणतात. पारशी धर्मियांसाठी आजचा दिवस महत्वाचाच आणि सण उत्सव या दिवशी साजरा करतात. आज घरोघरी पदार्थ बनवले जातात आणि नवीन कपडे घालून आणि घर सजवून आनंद व्यक्त करतात. हा सण पटेती आणि 'जमशेदी नवरोज' म्हणूनही ओळखला जातो.


'नवरोज' म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस म्हणजे आजच्या नवीन वर्षाला 'जमशेदी नवरोज' म्हटले जाते. कारण पारशी लोकांचे शूर योद्धा आणि पर्शियाचा राजा जमशेद यांनी पहिल्यांदाच आपल्या समाजातील लोकांना पारशी कॅलेंडरबद्दल सांगितले होते. 'नवरोज' म्हणजे पारशी दिनदर्शिकेचा पहिला दिवस, ज्याचे संपूर्ण समाज खुल्या मनाने आणि आनंदाने स्वागत करतो. या दिवशी पारशी समाजाचे लोक मंदिरात जाऊन विशेष पूजा करतात आणि अग्नीला आपला साक्षी मानतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात.




समाजातील लोक प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. विशेष म्हणजे या दिवशी हे लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात आणि घरात चंदन ठेवतात, असे मानले जाते की असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व वाईट गोष्टी घराबाहेर जातात. लोक एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे