राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह २५ सेलिब्रिटींवर बेकायदेशीर सट्टेबाजीप्रकरणी एफआयआर दाखल

तेलंगणा : बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराचे अॅप्स यांच्याशी संबंधित प्रकरणात राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह २५ सेलिब्रिटींवर तेलंगणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. उद्योजक फणिंद्र शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.

ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह २५ अभिनेत्यांचा समावेश आहे. बेटिंग अॅप्सचा प्रचार करण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की १६ मार्च रोजी काही युवकांशी चर्चा करताना लक्षात आले की सोशल मीडियावर प्रमोट केल्या जाणाऱ्या बेटिंग अॅप्सवर पैसे लावण्यास प्रोत्साहीत झाले होते. या अॅप्सना प्रमोट करण्यासाठी या सेलेब्रिटींकडून भरघोस पैसे घेतले जात असल्याचा आरोपही फणिंद्र शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
Comments
Add Comment

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला

मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी

PM Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक

Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका