Mumbai : मुंबई महापालिकेतील सहायक अभियंत्यांच्या बढतीत खोडा कुणाचा ?

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापासून ते कार्यकारी अभियंता पर्यंतचे अनेक अभियंते आज पदोन्नतीपासून वंचित असून मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आज सर्व प्रवर्गातील सुमारे २५० ते ३५० अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. आज पदोन्नतीने आणि थेट सहायक अभियंता पदी बढती मिळालेल्या अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित असून यातील वादातच कार्यकारी अभियंतापदाची बढती रखडलेली रखडलेली आहे. मात्र, सहायक अभियंता पदी थेट नियुक्ती होण्यापूर्वी ज्या ६८ अभियंत्यांना सहायक अभियंता म्हणून बढती मिळाली होती, त्यांचीही बढती प्रशासनाने रोखून धरल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे प्रशासन या ६८ सहायक अभियंत्यांना तरी कार्यकारी अभियंता म्हणून बढती देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.



मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी पदांवर कार्यरत असलेले अभियंते हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून कार्यतर असलेले पात्र कनिष्ठ अभिंयता हे दुय्यम अभियंता पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुय्यम अभियंता हे सहायक अभियंता आणि सहायक अभियंता हे कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभिंयता हे उपप्रमुख अभियंता या पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही त्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जात नाही. परिणामी आज अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून त्यामुळे अनेक अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. परिणामी अनेक प्रकल्प कामे तसेच विकासकामे यांना विलंब होत आहे. या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणू आचारसंहितेपूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते, परंतु लोकसभा आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागून संपुष्टात आल्यानंतरही पात्र अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही.



दोनच दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिकेतील सहायक अभियंता पदावरून कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मंजूर झालेल्या तथा बढती मिळालेल्या, परंतु त्यांना त्यांच्या अद्यापही ऑर्डर न काढल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे कार्यकारी अभियंता पदी पात्र होवूनही तथा बढती मिळूनही आजवर या ऑर्डर न काढता पदोन्नतीचा लाभ दिला जात नसल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी सहायक अभियंतापदी थेट भरती केली होती, तसेच पदोन्नतीने सहायक अभियंतापदी नियुक्त झालेल्या अभियंत्यांमध्ये सेवा जेष्ठतेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. यांच्या वादात कार्यकारी अभियंता पदी बढती मिळण्याचा मार्ग रखडला आहे. त्यामुळे या दोन्ही संवर्गातील अभियंत्यांची सामाईक सेवा ज्येष्ठता यादी तयार करून यावर मार्ग काढणे आवश्यक असतानाही हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.



विशेष म्हणजे सहायक अभियंतापदी थेट नियुक्ती होण्यापूर्वी ६८ अभियंत्यांना सहायक अभियंता पदी बढती मिळाली होती. त्यामुळे ६८ सहायक अभियंतापदी असलेल्या अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदी बढती देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसूनही प्रशासन यावर अडून बसले आहे. नगर अभियंता विभागाच्या आस्थापनावर कोणाचाही अंकुश नसल्याने असे प्रकार होत असून सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता या पदावरील पदोन्नतीचा वाद असून प्रशासन स्तरावर हा तिढा सोडवणे आवश्यक आहे, पण प्रशासन त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ अभियंत्यांची १०० टक्के पदे बाहेरुन भरली जात असून या भरतीची जाहिरात दिली आहे, तसेच सहायक अभियंता पदावरील ५० टक्के पदे ही अंतर्गत अभियंत्यांच्या पदोन्नतीतून आणि उर्वरीत ५० टक्के बाहेरुन जाहिरात देवून भरली जातात. त्यामुळे या पदोन्नती आणि रिक्तपदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याचे नगरअभियंता महेंद्र उबाळे हे वारंवार सांगत असले तरी आज तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही यावर नगरअभियंता विभागाला आणि या विभागाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न तथा पुढाकार घेताना दिसत नाही. परिणामी अनेक अभियंत्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा पडत असून अनेक अभियंत्यांच्या बदल्याही या कारणांमुळे होत नाही,असे चित्र सध्या दिसून येत आहे.



अशाप्रकारे आहेत अभियंत्यांची पदे रिक्त

कनिष्ठ अभियंता ते दुय्यम अभियंता सिविल २०० पदे

कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत १०० पदे रिक्त

सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता यांची ६८ पदे रिक्त
Comments
Add Comment

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’