राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची आयपीएल ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएलच्या नव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघ नव्या दमाने मैदानात उतरणार असून संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली हा संघ अत्यंत संतुलित दिसत आहे. जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्ष्णा यांच्या समावेशामुळे संघाची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. मात्र यंदाच्या मोसमात संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला जेतेपद मिळवता येईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे चांगलेच लक्ष आहे.

राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर २०२४ मध्येही संघाने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या टप्प्यात अपयश पदरात आले. यंदा संघाने आपल्या चुका सुधारून अंतिम टप्प्यात अधिक मजबुतीने खेळण्याचा निर्धार केला आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत नव्या हंगामासाठी संघ अधिक मजबूत केला आहे. संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत, तर जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश गोलंदाजीला धारदार बनवतो.

राहुल द्रविडचे लाभणार मार्गदर्शन

गेल्या हंगामात राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता संघ पुन्हा नव्या जोशात उतरून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला चांगली रणनीती आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार

संजू सॅमसन (कर्णधार)
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
नितीश राणा
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर
संदीप शर्मा
जोफ्रा आर्चर
महीश तीक्ष्णा
वानिंदू हसरंगा
फजलहक फारूकी

 
Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे