राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची आयपीएल ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएलच्या नव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघ नव्या दमाने मैदानात उतरणार असून संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली हा संघ अत्यंत संतुलित दिसत आहे. जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्ष्णा यांच्या समावेशामुळे संघाची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. मात्र यंदाच्या मोसमात संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला जेतेपद मिळवता येईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे चांगलेच लक्ष आहे.

राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर २०२४ मध्येही संघाने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या टप्प्यात अपयश पदरात आले. यंदा संघाने आपल्या चुका सुधारून अंतिम टप्प्यात अधिक मजबुतीने खेळण्याचा निर्धार केला आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत नव्या हंगामासाठी संघ अधिक मजबूत केला आहे. संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत, तर जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश गोलंदाजीला धारदार बनवतो.

राहुल द्रविडचे लाभणार मार्गदर्शन

गेल्या हंगामात राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता संघ पुन्हा नव्या जोशात उतरून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला चांगली रणनीती आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार

संजू सॅमसन (कर्णधार)
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
नितीश राणा
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर
संदीप शर्मा
जोफ्रा आर्चर
महीश तीक्ष्णा
वानिंदू हसरंगा
फजलहक फारूकी

 
Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन