राजस्थान रॉयल्स जिंकणार यंदाची आयपीएल ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आयपीएलच्या नव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघ नव्या दमाने मैदानात उतरणार असून संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली हा संघ अत्यंत संतुलित दिसत आहे. जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्ष्णा यांच्या समावेशामुळे संघाची गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. मात्र यंदाच्या मोसमात संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला जेतेपद मिळवता येईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे चांगलेच लक्ष आहे.

राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. तर २०२४ मध्येही संघाने दमदार सुरुवात केली, पण शेवटच्या टप्प्यात अपयश पदरात आले. यंदा संघाने आपल्या चुका सुधारून अंतिम टप्प्यात अधिक मजबुतीने खेळण्याचा निर्धार केला आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवत नव्या हंगामासाठी संघ अधिक मजबूत केला आहे. संघात यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर यांसारखे फलंदाज आहेत, तर जोफ्रा आर्चर, महीश तीक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांचा समावेश गोलंदाजीला धारदार बनवतो.

राहुल द्रविडचे लाभणार मार्गदर्शन

गेल्या हंगामात राजस्थानने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. आता संघ पुन्हा नव्या जोशात उतरून ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाला चांगली रणनीती आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य शिलेदार

संजू सॅमसन (कर्णधार)
यशस्वी जैस्वाल
रियान पराग
नितीश राणा
ध्रुव जुरेल
शिमरॉन हेटमायर
संदीप शर्मा
जोफ्रा आर्चर
महीश तीक्ष्णा
वानिंदू हसरंगा
फजलहक फारूकी

 
Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स