NASA Astronauts Sunita Williams : ...म्हणून मोदी म्हणाले पृथ्वीला तुमची आठवण आली

मुंबई : संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्ब्ल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. या क्षणाचे भारतवासीयांनीच नाही तर पंतप्रधानांनीही कौतुक केले आहे.



नासाच्या अंतराळवीर (NASA Astronauts) सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. याचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान मोदींनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांची सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुकाने पाठ थोपटली आहे. वेलकम बॅक crew ९ या पृथ्वीला तुमची आठवण येत होती. असे मोदी म्हणाले.





काय म्हणाले पंतप्रधान मोदी


#Crew9, तुमचं स्वागत आहे! पृथ्वीला तुमची आठवण येत होती. Crew9च्या टीमसाठी धैर्य, धाडस आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अज्ञातासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल. अवकाश संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. सुनीता विल्यम्सने तिच्या कारकिर्दीत याचे उत्तम उदाहरण जगाला दिले आहे. त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचा आम्हाला अविश्वसनीय अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला भेटते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटी रुपयांना होणार विक्री!

जुहू बीचच्या किनाऱ्यावर वास्तुकलेमुळे आणि किमती परिसरामुळे शहरातील मौल्यवान मालमत्ता मुंबई : मुंबईतील सर्वात

प्रचार सुरू असतानाच शिवसेना उमेदवारावर हल्ला

वांद्र्यातील घटनेने निवडणुकीत खळबळ मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे