कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत होणार विलीन..!

संतोष राऊळ

कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीन करावे अशी मागणी गेले कित्येक वर्ष माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे यांची आहे. कोकण रेल्वे अधिक गतिमान त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक निर्माण व्हावा.कोकण रेल्वेची स्थानके सुशोभित आणि अद्ययावत व्हावीत.कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळणाऱ्या दरडी कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रत्येकाची असताना,कोकण रेल्वे महामंडळ ती पूर्ण करू शकत नाही. कारण,त्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची क्षमता या महामंडळाकडे नाही. हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन केल्यास त्यावर अधिकचा निधी खर्च करून केला जाऊ शकतो आणि तसा निधी खर्च करण्यासाठी आणि याचा विकास होण्यासाठी चारही राज्यांची संमती आवश्यक आहे. आणि ती संमती इतर तीन राज्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य आज केंद्राला कोकण रेल्वे केंद्रीय रेल्वेत सामील करून घेण्याची परवानगी देत आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.



कोकण रेल्वे महामंडळ हे केरळ,कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांचे आहे.मात्र या महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे मुळात तोट्यात असलेले हे महामंडळ फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही किंवा अधिकच्या सुधारणा करू शकत नाही. त्यामुळे या कोकण रेल्वे अधिक सेवा सुविधा देण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या दुहेरी करण करण्यासाठी, प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांसाठी किंवा रेल्वेच्या सुरक्षेसाठी, मार्ग सुरक्षित करण्याचे काम करायचे झाल्यास हे कोकण रेल्वे महामंडळ खर्च करू शकत नाही. त्यासाठी केरळ,कर्नाटक,गोवा या राज्यांची तयारी आहे.आपल्याही राज्याने ती केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात हे महामंडळ केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात विलीन करून विकास प्रक्रियेत या महामंडळाला आणले जाईल. आज जे प्रश्न निर्माण होत आहे ते होणार नाहीत.आणि अधिक गुंतवणूक केंद्र सरकार या महामंडळात करेल असा विश्वास विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



दरम्यान केंद्रात कोकण रेल्वे महामंडळ विलीन झाले तरी या मंडळाचे किंवा कोकण रेल्वेचे नाव बदलणार नाही ते कोकण रेल्वे असेच राहणार फक्त नियंत्रण केंद्रीय रेल्वे मंडळ करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह