Indian Railway: कन्फर्म तिकीटे आता नक्की मिळणार! आता जितक्या सीट्स तितकीच तिकीटे विकणार रेल्वे

  109

मुंबई: रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अनेकदा लोकांना रेल्वेच्या डब्यात जागेची समस्या सतावते. खासकरून सणांच्या वेळेस रेल्वेंमध्ये तुफान गर्दी असते. यूपी-बिहारला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तर गर्दीची सोयच नसते. यामुळे रेल्वेची तिकीटेही मिळणे मुश्किल असते. अशातच भारतीय रेल्वे एक नवा बदल करत आहे. रेल्वे आता प्रवाशांना केवळ कन्फर्म तिकीटच देणार आहे.


केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वेशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली. रेल्वे मंत्री म्हणाले, रेल्वेंमधील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता सीटच्या हिशेबाने तिकीट जारी केले जातील. म्हणजेच जितक्या सीट्स असतील तितकीच तिकीटे विकली जातील. यामुळे रेल्वेतील कन्फर्म सीटसोबत प्रवास करणाऱ्यांना वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांचा त्रास होणार नाही.



विना तिकीट प्रवास केल्यास इतका दंड


जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत असताना पकडले गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागले. जर तुमच्याकडे पैसे नाहीत अथवा तुम्ही दंड भरायला नकार दिलात तर तुम्हाला आरपीएफकडे सोपवले जाईल. सोबच रेल्वे अधिनियमच्या कलम १३७ अंतर्गत केस दाखल केली जाईल. आरपीएफ या प्रवाशांना रजिस्टारसमोर सादर करेल. अशातच त्यांना एक हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते.



सुरक्षिततेवर भर


अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की रेल्वेचा सुरक्षेवर अधिक भर असणार आहे. त्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आलेले आहेत. यात लाँगर रेल, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाईस तसेच अनेक गोष्टींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती