Indian Railway: कन्फर्म तिकीटे आता नक्की मिळणार! आता जितक्या सीट्स तितकीच तिकीटे विकणार रेल्वे

मुंबई: रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अनेकदा लोकांना रेल्वेच्या डब्यात जागेची समस्या सतावते. खासकरून सणांच्या वेळेस रेल्वेंमध्ये तुफान गर्दी असते. यूपी-बिहारला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तर गर्दीची सोयच नसते. यामुळे रेल्वेची तिकीटेही मिळणे मुश्किल असते. अशातच भारतीय रेल्वे एक नवा बदल करत आहे. रेल्वे आता प्रवाशांना केवळ कन्फर्म तिकीटच देणार आहे.


केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वेशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाची माहिती दिली. रेल्वे मंत्री म्हणाले, रेल्वेंमधील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता सीटच्या हिशेबाने तिकीट जारी केले जातील. म्हणजेच जितक्या सीट्स असतील तितकीच तिकीटे विकली जातील. यामुळे रेल्वेतील कन्फर्म सीटसोबत प्रवास करणाऱ्यांना वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांचा त्रास होणार नाही.



विना तिकीट प्रवास केल्यास इतका दंड


जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करत असताना पकडले गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागले. जर तुमच्याकडे पैसे नाहीत अथवा तुम्ही दंड भरायला नकार दिलात तर तुम्हाला आरपीएफकडे सोपवले जाईल. सोबच रेल्वे अधिनियमच्या कलम १३७ अंतर्गत केस दाखल केली जाईल. आरपीएफ या प्रवाशांना रजिस्टारसमोर सादर करेल. अशातच त्यांना एक हजार रूपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते.



सुरक्षिततेवर भर


अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की रेल्वेचा सुरक्षेवर अधिक भर असणार आहे. त्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आलेले आहेत. यात लाँगर रेल, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाईस तसेच अनेक गोष्टींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ