गैरव्यवहार करणाऱ्या सहकारी सोसायाटींवर कारवाई करणार

मुंबई : कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करणाऱ्या सहकारी सोसायटींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सदाशिव खोत यांनी अर्धातासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या सांगली जिल्ह्यातील सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहाराच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते. सांगली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने दिलेल्या खावटी कर्ज प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल असे सांगून राज्यमंत्री भोयर म्हणाले की, एक हजार पेक्षा जास्तीचे कर्ज चेकने वितरीत करावयाचे असून ते रोखीने देता येत नाही. तसेच ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज वाटप करता येत नाही.अशा प्रकारे कर्ज वाटप करून त्याच्या वसुलीसाठी एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करण्यात येत असेल तर अशा प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात येईल. तसेच अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव करता येणार नाही किंवा जप्तही करता येणार नाही. चौकशी झाल्यानंतरच सबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत निर्णय घेतला जाईल असेही राज्यमंत्री भोयर यांनी सभागृहात सांगितले.

Comments
Add Comment

BMC School : महापालिका शाळेत गणिताचा गुरुवार, सायन्सचा सोमवार उपक्रम

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव मुंबई (विशेष

Water Shortage : भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, अशी मागणी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची मागणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात यंदाच्या मान्सून हंगामाच्या

Sejal Pawar : एमबीबीएस विद्यार्थिनीकडून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील एमबीबीएस

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया मुंबई (विशेष

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत