MLC By Poll : विधान परिषदेत उरली महायुतीच्या विजयाची औपचारिकता

मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची औपचारिक घोषणा २० तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीसाठी महायुतीच्या पाच उमेदवारांच्या व्यतिरिक्त फक्त एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. छाननीवेळी नियमानुसार आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. आता निवडणूक रिंगणात पाच रिक्त जागांसाठीचे महायुतीच्या पाच उमेदवारांचे अर्जच शिल्लक आहेत. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारांच्या विजयाची औपचारिक घोषणा २० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल.



विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे पाच उमेदवार

  1. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे - भाजपा

  2. चंद्रकांत रघुवंशी - शिवसेना

  3. संजय खोडके - राष्ट्रवादी काँग्रेस




राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी १७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. अर्जांची छाननी १८ मार्च रोजी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० मार्च पर्यंत असेल.
Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे