MLC By Poll : विधान परिषदेत उरली महायुतीच्या विजयाची औपचारिकता

मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची औपचारिक घोषणा २० तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीसाठी महायुतीच्या पाच उमेदवारांच्या व्यतिरिक्त फक्त एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. छाननीवेळी नियमानुसार आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. आता निवडणूक रिंगणात पाच रिक्त जागांसाठीचे महायुतीच्या पाच उमेदवारांचे अर्जच शिल्लक आहेत. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारांच्या विजयाची औपचारिक घोषणा २० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल.



विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे पाच उमेदवार

  1. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे - भाजपा

  2. चंद्रकांत रघुवंशी - शिवसेना

  3. संजय खोडके - राष्ट्रवादी काँग्रेस




राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी १७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. अर्जांची छाननी १८ मार्च रोजी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० मार्च पर्यंत असेल.
Comments
Add Comment

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००