Samay Raina : समय रैनाच्या अडचणीत भर, सायबर सेलने बजावला नवा समन्स

  51

मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये (India’s Got Latent) युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे. समय रैनाला १९ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. युट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळून लावली आहे. त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. यामुळे समय रैनाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.



महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैनाला समन्स बजावले होते. त्यानुसार त्याला १७ मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होत. पण तो अनुपस्थित राहिला. रैना परदेशात असल्यामुळे त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. सध्या रैना हा देशाबाहेर असल्यामुळे त्याने ही विनंती केली. मात्र, महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांना मागणी फेटाळली आणि त्याला वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवावा लागेल, असे सांगितले. त्यांच्या जबाबासाठी त्याला १९ मार्चला कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तो सध्या अमेरिकेमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



३०, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल


‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासोबत इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. एका स्पर्धकाशी संभाषण करताना अलाहबादियाने वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.


याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे समय रैनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आता चौकशीसाठी हजर राहावेच लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढू शकतात.

Comments
Add Comment

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या

दादरमध्ये सुरांच्या रूपात अवतरणार पंढरपूर

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्ताने भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. देवाला आळविण्याचा

'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक

प्रेक्षक म्हणतात झी मराठीवर जुने दिवस नव्याने येणार ....तेजश्री प्रधानच सिनेसृष्टीतील बड्या अभिनेत्यासोबत पुनरागमन

     सध्या झी मराठीवर एका ट्रेलर ने धुमाकूळ घातला आहे आणि तो ट्रेलर म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची