Samay Raina : समय रैनाच्या अडचणीत भर, सायबर सेलने बजावला नवा समन्स

मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये (India’s Got Latent) युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे. समय रैनाला १९ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. युट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळून लावली आहे. त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. यामुळे समय रैनाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.



महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैनाला समन्स बजावले होते. त्यानुसार त्याला १७ मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होत. पण तो अनुपस्थित राहिला. रैना परदेशात असल्यामुळे त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. सध्या रैना हा देशाबाहेर असल्यामुळे त्याने ही विनंती केली. मात्र, महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांना मागणी फेटाळली आणि त्याला वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवावा लागेल, असे सांगितले. त्यांच्या जबाबासाठी त्याला १९ मार्चला कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तो सध्या अमेरिकेमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



३०, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल


‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासोबत इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते. एका स्पर्धकाशी संभाषण करताना अलाहबादियाने वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.


याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे समय रैनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आता चौकशीसाठी हजर राहावेच लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढू शकतात.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष