Shivsena : विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! 'या' नेत्याला मिळणार संधी

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा पाठोपाठ शिवसेनेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly 2025) विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. आज या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रघुवंशी हे अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणूकीसाठी भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी कोणाला संधी मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?


चंद्रकांत रघुवंशी हे धुळे-नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. ते १९९२ पासून राजकारणात आहेत. ते सहा वर्षे धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते सलग तीनवेळा विधानपरिषदेत निवडून गेले होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटात सामील झाले होते. आता त्यांना विधानपरिषदेची उमेद्वारी मिळाली आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून