Shivsena : विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! 'या' नेत्याला मिळणार संधी

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा पाठोपाठ शिवसेनेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly 2025) विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. आज या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रघुवंशी हे अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणूकीसाठी भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी कोणाला संधी मिळणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?


चंद्रकांत रघुवंशी हे धुळे-नंदुरबारचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. ते १९९२ पासून राजकारणात आहेत. ते सहा वर्षे धुळे व नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते सलग तीनवेळा विधानपरिषदेत निवडून गेले होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटात सामील झाले होते. आता त्यांना विधानपरिषदेची उमेद्वारी मिळाली आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण