एप्रिल, मे महिन्यांत मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

सातही धरणांमध्ये उरला ४२ टक्के पाणी साठा


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीला उन्हाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात देखील होत आहे.


मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.



धरणातील पाणी साठा


मोडक सागर धरण पाणी साठवण क्षमता १लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा २९ हजार २०१ दशलक्ष लीटर
तानसा धरण पाणी साठवण क्षमता १लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
भातसा धरण पाणी साठवण क्षमता ७लाख १७ हजार ३७ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४२ टक्के
मध्य वैतरणा धरण पाणी साठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी धरण
शिल्लक पाणी साठा ५० ते ५५ टक्के


Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी