एप्रिल, मे महिन्यांत मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

सातही धरणांमध्ये उरला ४२ टक्के पाणी साठा


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ४२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीला उन्हाने डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम मुंबईकरांसह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात देखील होत आहे.


मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. धरणाची क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. राज्य सरकारच्या आखत्यारित असलेल्या अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. राखीव कोट्यातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होतो.



धरणातील पाणी साठा


मोडक सागर धरण पाणी साठवण क्षमता १लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा २९ हजार २०१ दशलक्ष लीटर
तानसा धरण पाणी साठवण क्षमता १लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
भातसा धरण पाणी साठवण क्षमता ७लाख १७ हजार ३७ दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४२ टक्के
मध्य वैतरणा धरण पाणी साठवण क्षमता १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लीटर
शिल्लक पाणी साठा ४६ टक्के
अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी धरण
शिल्लक पाणी साठा ५० ते ५५ टक्के


Comments
Add Comment

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Maharashtra's Energy Capacity : महाराष्ट्राची ऊर्जा क्षमता वाढणार

 पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत मुंबई : राज्याच्या ऊर्जा

Minister Pankaja Munde : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश - पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित