Haous Lake Mahad : महाड शहराच्या सौंदर्यात पडणार भर

महाड  : ऐतिहासिक तळे म्हणून ओळख महाड शहरातील या हापूस तळ्याची ओळख आहे. महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत. त्यातील चवदार तळे जागतीक नकाशावर आहे. गांधारीनाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे. इतिहास काळात महाड हे बंदर होते व येथून मोठ्या प्रमाणात धान्ये व वस्तूंची उलाढाल होत असे. त्याकाळी रस्ते, पूल या सुविधा नव्हत्या. तेव्हा होडीनेच सामानाची वाहतूक होत असे. या होड्यांवर हबशी म्हणून काम करणारे या ठिकाणी पाण्याची सोय असल्याने मुक्कामाला उतरत असत. काम संपल्यावर माघारी जात त्यामुळे या तळ्याला हाबूस व नंतर हापूस तळे असे नाव पडल्याचे जूने जाणकार सांगतात.



हे तळे बुजलेले होते. तर आतमध्ये रानटी वनस्पतीही उगवलेल्या होत्या. परिसरातील इमारतींचे सांडपाणीही या तळ्यात जात होते. असे हे तळे अनेक वर्षे दुर्लक्षित होते. आता या तळ्याचा विकास नगर पालिकेने हाती घेतला आहे. तळ्यातील गाळ काढून उत्पाद देखील तयार करण्यात आला, परंतु यानंतर मात्र महाडमध्ये २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठला होता, तर फुटपाथ काम देखील खराब झाले, परंतु आता पुन्हा सध्या तळे साफ करण्याचे काम सुरू आहे. तळ्याचे खोदकाम केले जाणार असून गॅब्रियन वॅाल बांधल्या जाणार आहेत. तळ्याच्या भोवती सुमारे पाचशे मीटरच्या लांब व साडेचार फूट रुंद ट्रॅक राहणार आहे, भोवताली बाग, स्वच्छतागृह, पायऱ्या व बाजूने सांडपाणी झिरपू नये यासाठी गटारांची सुविधा केली जाणार आहे.

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिसवर दिसली झी स्टुडियोजच्या 'दशावतार' ची ताकद !

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.