PM Narendra Modi RSS : ‘आरएसएसला समजून घेणे सोपे नाही, त्यांचे कार्य समजून घेणे आवश्यक’

  55

नवी दिल्ली : ‘बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या बैठकांना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे हे मला ‘आरएसएस’ने शिकवले. या वर्षी १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘आरएसएस’पेक्षा जगात अन्य दुसरा मोठा 'स्वयंसेवी संघ' नाही. आरएसएस समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.


यावेळी नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले की, मला 'आरएसएस'सारख्या प्रतिष्ठित संघटनेकडून जीवनाचे सार आणि मूल्ये शिकायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाची सेवा करणे हे मला 'संघ'नेच हेच शिकवले. या वर्षी आरएसएस १०० वर्षे पूर्ण करत आहे. जगात आरएसएसपेक्षा मोठी 'स्वयंसेवी संघटना' नाही. आरएसएस समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घ्यावे लागेल. राष्ट्र हेच सर्वस्व आहे आणि समाजसेवा हीच देवाची सेवा आहे, हे आरएसएस सदस्यांना शिकवते.



आपल्या वैदिक संतांनी आणि स्वामी विवेकानंदांनी शिकवले तेच संघही शिकवतो. शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही सदस्यांनी 'विद्या भारती' नावाची संघटना सुरू केली. ते देशभरात सुमारे २५ हजार शाळा चालवतात. या शाळांमध्ये एकावेळी ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी चालवलेली कामगार चळवळ 'जगातील कामगारांनो, एकत्र या!' अशी आहे. तर आरएसएसची कामगार संघटना 'कामगारांनो, जगाला एकत्र करा!' असा नारा देते, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान मोदींना गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी मोदींनी मौन सोडत गुजरात दंगल प्रकरणावरही भाष्य केलं. तसेच जे त्या प्रकरणात दोषी होते, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाल्याचे त्यांनी सांगितले. २००२ च्या गुजरात दंगलींकडे मोदी कसे पाहतात? असं विचारलं असता मोदी म्हणाले की, “२००२ च्या दंगली भोवतीच्या चर्चेला खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार होत होता. २००२ पूर्वी देशात सतत दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेचे वातावरण होते, त्यामुळे तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हा जगातही दहशतवादी कारवायांमध्येही वाढ दिसून आली होती. १९९९ मध्ये कंधार अपहरण प्रकरण झालं होतं, २००० मध्ये लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता आणि २००१ मध्ये आपल्या संसदेवर हल्ला झाला होता. तो काळ मोठ्या आव्हानांचा होता. पण २००२ नंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल घडलेली नाही. आता राज्यात कायमस्वरूपी शांतता आहे”, असे मोदी म्हणाले.


पीएम मोदी यांनी पाकिस्तानाबाबत आपली मते स्पष्ट केली. ते म्हणाले की, १९४७ पूर्वी सर्वजण खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यानंतर देशाच्या धोरणकर्त्यांनी भारताची फाळणी मान्य केली आणि मुस्लिमांना त्यांचा देश दिला. हे भारतातील जनतेने मोठ्या जड अंतकरणाने मान्य केले, पण त्याचे परिणामही भोगावे लागले. या फाळणीमुळे झालेल्या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले.

Comments
Add Comment

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा