Gokhale Bridge : गोखले पूल मे मध्ये सुरू होणार; पूल विभागाची माहिती

मुंबई : अंधेरी येथील बहुचर्चित गोखले रोड पुलाचे बांधकाम आता युद्धपातळीवर सुरू असून येत्या मे महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाणार आहे. पुलाच्या पूर्व बाजूचे काम शिल्लक असून हे काम पूर्ण केले जात आहे. हे काम मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील आठवड्यातच हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती पूल विभागाकडून देण्यात आली आहे. सी. डी. बर्फीवाला रोड आणि एन. एस. फडके रोड यांना जोडणारा अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी महापालिकेने या कामासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कंत्राटदारांची नेमणूक केली होती. या कामासाठी ए. बी. इन्फ्राबिल्ड लि. या कंपनीची निवड करण्यात आली होती. अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर वाढले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेची मदत घेण्यात आली. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या पुलाच्या खर्चात अधिक वाढही झाली.



गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश सुरू आहे. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिल महिना अखेरपर्यंत पूर्ण करून ३० एप्रिल २०२५ पासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.