Mumbai Temperature : उन्हाची तीव्रता वाढल्याने बाटली बंद पाण्याच्या मागणीत वाढ

मुंबई : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाटली बंद पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ बाटलीतून गार पाणी दिले जात असल्याचे काही सजग नागरिक सांगत आहेत.


नागरिक जे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत, त्या बाटलीवर पाणी कधी भरले, ते शुद्ध आहे का, ते कधीपर्यंत वापरायचे आहे. याविषयी काहीच उल्लेख नसतो. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.



बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क