Mumbai Temperature : उन्हाची तीव्रता वाढल्याने बाटली बंद पाण्याच्या मागणीत वाढ

मुंबई : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाटली बंद पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ बाटलीतून गार पाणी दिले जात असल्याचे काही सजग नागरिक सांगत आहेत.


नागरिक जे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत, त्या बाटलीवर पाणी कधी भरले, ते शुद्ध आहे का, ते कधीपर्यंत वापरायचे आहे. याविषयी काहीच उल्लेख नसतो. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.



बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये