मुंबईतील नॅशनल पार्कचा प्रवेश महागला, इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही १० टक्के वाढ

मुंबई : रिक्षा, टॅक्सी आणि एसटीच्या भाड्यात आधीच सरकारने वाढ करून सर्वसामान्यांना अडचणीत टाकले होते, आता पर्यटकांच्या खिशावरही टोल घेतला आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 रुपयांवरून 103 रुपये करण्यात आले आहे.तसेच इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या तोंडावरच ही मोठी दरवाढ झाल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे.


मुंबईकर रविवारी व सुट्टीच्या दिवशी नॅशनल पार्कमध्ये कुटुंबासह फिरायला जातात. मात्र, सरकारच्या या दरवाढीने त्यांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. सध्या नॅशनल पार्कमध्ये प्रवेशासाठी 103 रुपये भरावे लागत आहेत. याशिवाय, लायन सफारी, टायगर सफारी, सायकलिंग आणि कान्हेरी गुंफा भेटीसाठी वेगळे तिकीट घ्यावे लागत आहे, आणि त्यांच्याही दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी, प्रत्येक व्यक्तीला किमान 1000 रुपयांचा खर्च येत आहे, जो सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.


यामुळे होळी, धूलिवंदन आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमध्येही नॅशनल पार्कमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. उलट पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सरकारची ही भूमिका पर्यटनासाठी 'मारक' ठरत आहे. दरम्यान, नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी सूचना पेटी ठेवण्यात आली आहे, जिथे पर्यटकांना सेवा व सुविधांबाबत अभिप्राय नोंदवता येतो. मात्र, याठिकाणी सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया अधिक आढळत आहेत. वाढीव तिकीट दरामुळे नाराज पर्यटक सरकारवर टीका करत आहेत.


लहानग्यांचे आकर्षण असलेली 'टॉय ट्रेन' मागील चार वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाने ही ट्रेन मे महिन्याच्या सुट्टीत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ट्रॅक व इतर कामे पूर्ण होण्यास अजून तीन-चार महिने लागतील, असे नॅशनल पार्कमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.