वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

जळगाव :  जळगावात एका तरुणाचे लग्न एजंटच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले, मात्र नववधूने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन घरातून पसार होत वरपक्षाची तब्बल २.४४ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात वधूसह एजंट आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रामेश्वर कॉलनीतील २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण कुटुंबासह राहतो. बराच काळ वधू न मिळाल्याने त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील एजंट आशाबाई हिच्याशी संपर्क साधला. आशाबाईने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, जि. यवतमाळ) ही मुलगी दाखवली आणि एकूण १.६० लाख रुपयांचा व्यवहार ठरला. १८ फेब्रुवारी रोजी एजंट आशाबाई, वधू पूजा गावडे, तिची आई निर्मलाबाई डोंगरे, मावसा शिवशंकर आणि मामा गोपाळ खंडारे हे तरुणाच्या घरी आले. दुसऱ्याच दिवशी १९ फेब्रुवारी रोजी तातडीने लग्न लावून देण्यात आले. पैसे मिळताच एजंट आणि वधूचे नातेवाईक लग्नमंडपातून निघून गेले.


२२ फेब्रुवारी रोजी रात्री सर्वजण झोपल्यानंतर वधू पूजा गावडे अचानक घरातून गायब झाली. सकाळी घरच्यांनी पाहिले असता, ती ८४ हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र, कर्णफुले आणि सोनपोत घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले.


तरुणाने एजंट आणि वधूच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे आणि शिवशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये