Thane News : अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणे पडले महागात!

ठाणे : राज्यात वाहन परवाना मिळविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच परवान्या शिवाय वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही नागरिक या कायद्याचा भंग करतात. परंतु पोलिसांच्या तपासणीदरम्यान परवाना नसलेले चालक आढळल्यावर मात्र त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. असाच प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.


आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवित असलेल्या एका अल्पवयीन मुलावर तसेच वाहन परवाना नसतानाही त्याला कार चालविण्यासाठी दिली म्हणून त्याच्या वडीलांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निमित्ताने अल्पवयीन मुलाच्या हातात कारची चावी देणे वडीलांना महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.



ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. ही पथकाने श्वास विश्लेषक यंत्राद्वारे चालकांची तपासणी करीत होती. याशिवाय पोलिसांच्या पथकाने चौका-चौकात उभे राहून नेहमीप्रमाणे कारवाई करत होती.


यावेळी घोडबंदर येथील आनंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा कार चालवित असल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली शाखेतील पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या मुलाला रोखले आणि त्याची चौकशी केली.

Comments
Add Comment

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक