Attack on Pakistan Army : बीएलएच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार

इस्लामाबाद : बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाले. पाकिस्तानच्या लष्कराचा ताफा क्वेट्टा येथून तफ्तानच्या दिशेने जात होता. यावेळी नोशकी जिल्ह्यात पाकिस्तानच्या लष्करी वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला. हा हल्ला यशस्वी झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाल्याचा दावा बीएलएने प्रसिद्धीपत्रक काढून केला आहे.



क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्करी ताफ्यात सात बस आणि दोन मोठी वाहने होती. यातील एका बसला आयईडी भरलेल्या वाहनाने धडक दिली. पाठोपाठ दुसऱ्या बसवर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे (आरपीजी) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ९० जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने प्रसिद्धपत्रक काढून दावा केला आहे की, नोशकी येथील आरसीडी महामार्गावरील रख्शान मिलजवळ व्हीबीआयईडी हल्ल्यात ९० जवान ठार झाले. हा हल्ला बीएलएच्या माजिद ब्रिगेड या आर्मी युनिटने केला आहे. लष्करी ताफ्यातील बसपैकी एक बस पूर्ण नष्ट झाली आहे. इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील