Maharashtra ST : एसटीमध्ये पुन्हा वारी पर्व

दोन बाय तीन आसनाच्या वारी बस लवकरच एसटीच्या ताफ्यात


मुंबई : २००५-०६ मध्ये एसटी महामंडळाने १२ मीटर लांबीची वारी बस सेवेत आणली होती.२ बाय ३ आसनप्रकार असलेल्या या बसला ६६ आसने होती.आता एसटी महामंडळ पुन्हा एकदा ३ ×२ साध्या बस सेवेत आणण्याची योजना आखत असून, ४ मार्च रोजी ३००० बसेसचे कस्टम टेंडर महामंडळाने काढले आहेत. वाढत्या प्रवाशांना तोंड देण्यासाठी पुन्हा या बस आणल्याने सध्या प्रवाशांना बसमध्ये मिळत असलेल्या सोयी मात्र कमी होणार आहे.त्यामुळे कालानुरूप बदल होत गेलेल्या एस.टी बस पुन्हा काही वर्षे मागे जाणार का असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. काही वर्षांपूर्वी एसटीने लाल-पिवळा रंग बदलून संपूर्ण टोमॅटो लाल केला.रंगसंगतीसोबतच,महामंडळाने बसमधील आसने २×२ बनवण्यासाठी पाऊल उचलले,ज्यामुळे प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाची व्याख्याच बदलून एक आमूलाग्र बदल झाला व प्रवाशी वाढले.बसचे ही अॅल्युमिनियम बांधकाम सोडून, एसटी २०१८ च्या सुमारास 'सौम्य स्टील' प्रकारात बनवू लागल्या,ज्यामुळे बसची रचना मजबूत होऊन प्रवासासाठी बस अधिक सुरक्षित झाली.या बसमध्ये अनेक बदल करून,महामंडळ,कंत्राटी आणि मालकीच्या बसेस आता एकाच प्रकारात सेवा देत आहेत. पण जेव्हा 'भारत ६' या बसेस सेवेत येऊ लागल्या तेव्हा महामंडळाने बसमध्ये एक पाऊल पुढे टाकून आमूलाग्र बदल केले.(Maharashtra ST)


सध्याच्या परिस्थितीत कंत्राटी साध्या बसेसमध्ये पुशबॅक सीट्स आणि प्रत्येक सीटला यूएसबी मोबाईल चार्जिंग देऊन,या साध्या बसेसची गुणवत्ता वाढवली आहे.ज्याप्रमाणे ट्रॅव्हल बसेस सेवा देतात,त्याचप्रमाणे एसटीने त्यांच्या साध्या बस सेवेत केलेला बदल खूप महत्त्वाचा होता आणि प्रवाशांनी देखील मोठ्या प्रमाणात त्याचे स्वागत केले. साध्या बसमध्ये ज्या सुविधा होत्या, त्याच सुविधा हिरकणी बसमध्ये सुद्धा देण्यात आल्या.त्यामुळे प्रवासीही वाढले आहेत.


साध्या दरात २×२ सेवा देणारी भारतातील एकमेव एसटी महामंडळ असताना,महामंडळाला पुन्हा ३×२ बसेस का घ्यायच्या आहेत याचे पहिले कारण म्हणजे सवलतीमुळे वाढलेली गर्दी,महिलांसाठी अर्धे तिकीट,तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास यामुळे एसटीमध्ये आता गर्दी वाढत आहे, परिणामी एसटी बसेस आणि अधिक जागांची गरज निर्माण झाली आहे.आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मागील नॉन-पुशबॅक (१२ मीटर) बसेसची आसन क्षमता ४५ पर्यंत असताना, नवीन अशोक लेलँड रेडीबिल्ट साध्या बसेसमध्ये तीच आसन क्षमता ५ वरून ४० पर्यंत घसरली आहे, म्हणजेच ५ जागांची घट झाली आहे, असे महामंडळाचे म्हणणे आहे. म्हणून तोटा कमी करण्यासाठी महामंडळ आता ३ बाय २ प्रकारच्या वारी बस घेणार आहे. मात्र त्यात पुश बँक व मोबाईल चार्जर नसेल . त्यामुळे या बस जर ठरावीक मध्यम किंवा स्थानिक मार्गावर न धावता लांब टप्य्याच्या मार्गावर धावल्यास प्रवाशाना योग्य त्या सोयी मिळू शकणार नाही.त्यामुळे प्रवासी नाराज होण्याची शक्यता आहे.(Maharashtra ST)

Comments
Add Comment

Metro 3 मध्ये मोबाईल नेटवर्कबाबत भेडसावणाऱ्या समस्या दूर होणार

मुंबई : मुंबई मेट्रो रेल मर्यादित (एमएमआरसी) मेट्रो-३ (अॅक्वा लाईन) मार्गिकेवरील मोबाईल नेटवर्क सेवा पुन्हा सुरू

Western Railway : पश्चिम रेल्वे मुंबई आणि गोरखपूर दरम्यान विशेष गाडी चालवणार

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची सोय करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम

CSMT : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील ब्लॉकला मुदतवाढ

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास आणि

'दावोस'मधील करारांच्या अंमलबजावणीसाठी १० अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी १० प्रकल्प

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; जमीन वाटप आणि परवानग्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई : स्वित्झर्लंडच्या

Metro 3 : मेट्रो ३ सेवा पूर्ववत, प्रशासनाने मागितली प्रवाशांची माफी

मुंबई : लोकल ट्रेन प्रमाणेच मेट्रो सेवेलाही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जात आहे. आरे – कफ परेड मेट्रो ३

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून नायर रुग्णालयात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर; रुग्णांना जलद व अचूक निदान सेवा मुंबई: मुंबईतील टोपीवाला नॅशनल