Ranbir Kapoor : आलियाचा वाढदिवस सोडून रणबीर मैत्रीला जागला

मुंबई : बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून आलिया आणि रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) बघितलं जात. या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आदर्श उभा केला आहे. पत्नी आलियाचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीचं नातं जपण्याला प्राधान्य दिलं. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांनी वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलिया आणि रणबीर जोडीने हजर राहिल्याचं पाहायला मिळालं.



आलियाचा आज (१५ मार्च ) वाढदिवस आहे. (Alia Birthday) मात्र आलिया आणि रणबीरने वाढदिवसाचं प्री सेलिब्रेशन १३ मार्च ला माध्यमांसोबत अलिबाग येथे केले. त्यानंतर रणबीरला अयान मुखर्जीच्या वडिलांची निधनाची बातमी समजल्यानंतर त्याने तडक मुंबई गाठली. अयान मुखर्जीच्या वडीलांचे निधन १४ मार्चला झाले. मुंबईला येताच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या घरी गेले. तेव्हा अयानच्या घरी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. बॉलिवूडचे अनेक कलाकार अयान मुखर्जीच्या घरी आले होते. यात करण जोहर, जया बच्चन, सलीम खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.(Alia Birthday)


अयान सोबत रणबीरने देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान बायकोचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीला प्राधान्य दिले. रणबीरच्या या कृतीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची