ISRO : दहा वर्षांत ‘इस्रो’ झाली मालामाल

परदेशी सॅटेलाइट लॉन्च; १४३ मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई


नवी दिल्ली : भारताने इस्रोच्या माध्यमाने २०१५ ते २०२४ या कालावधीत परदेशी सॅटेलाइट लॉन्च करून तब्बल १४३ मिलियन अमेरिकन डॉलर (१२ अब्ज भारतीय रुपयांपेक्षाही अधिक) परदेशी चलन मिळवले आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली. जितेंद्र सिंह हे अंतराळ क्षेत्राचे प्रभारी आहेत. इस्रोने गेल्या दहा वर्षांत अर्थात जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आपल्या पीएसएलव्ही, एलव्हीएम ३ आणि एसएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमाने ३९३ परदेशी, तर ३ भारतीय ग्राहकांचे सॅटेलाइट लॉन्च केले आहेत.(ISRO)



जितेंद्र सिंह म्हणाले, भारताने आतापर्यंत ३४ देशांचे सॅटेलाईट लॉन्च केले आहेत. यात अमेरिकेचे २३२, इंग्लंडचे ८३, सिंगापूरचे १९, कॅनडाचे ८, दक्षिण कोरियाचे ५, लक्समबर्ग आणि इटलीचे प्रत्येकी ४-४, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि फिनलँडचे प्रत्येकी ३-३ सॅटेलाइट्सचा समावेश आहे. याशिवाय, भारताने जपान, इस्रायल, स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात आणि ऑस्ट्रिया यांचेही सॅटेलाइट लॉन्च केले आहेत.(ISRO)


२०२३ मध्ये २ महापराक्रम - आज भारत हा एक मोठी अंतराळ शक्ती बणून समोर आला आहे. भारताने २०२3 मध्ये दोन महापराक्रम केले. पहिला म्हणजे, चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग आणि दुसरे म्हणजे, आदित्य-एल-१ हे भारताचे पहिले सौर मिशन बनले, जे सध्या सूर्याचा अभ्यास करत आहे. याशिवाय भारत गगनयानची तयारीही करत आहे.



२०३५ पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक


आज भारत हा एक मोठी अंतराळ शक्ती बनून समोर आला आहे. भारताने २०२३ मध्ये दोन महापराक्रम केले. पहिला म्हणजे, चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग आणि दुसरे म्हणजे, आदित्य-एल-१ हे भारताचे पहिले सौर मिशन बनले, जे सध्या सूर्याचा अभ्यास करत आहे. याशिवाय भारत गगनयानची तयारीही करत आहे. भविष्यातील प्लॅनिंगचा विचार करता, २०३५ पर्यंत स्वतःचे ‘भारतीय अंतराळ स्थानक’ तयार करण्याचे आणि २०४० पर्यंत पहिली भारतीय व्यक्ती चंद्रावर पाठवण्याचे टार्गेट आहे.

Comments
Add Comment

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी