Dhule News : ...अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं! धुळ्यात घडला 'असा' चमत्कार

धुळे : नंदुरबारमधील (Nandurbar) धडगाव तालुक्यात एक विलक्षण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. होळीला माहेरी आलेल्या एका महिलेचे  दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले होते. बाळ काहीच हालचाल करत नसल्यामुळे  घरच्या लोकांना बाळाचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने महिलेच्या माहेरी आणि सासरी रडारड सुरू झाली. मात्र अशातच डॉक्टरांच्या रुपाने आलेल्या देवदूताने केलेल्या एका कृतीमुळे बाळ जिवंत झाले. या घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून हसरे वातावरण निर्माण झाले आहे.



नेमकं प्रकरण काय?


धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा ही महिला तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह होळीसाठी आपल्या माहेरी गेली होती. माहेरी गेल्यावर बाळाची तब्येत बिघडली. उलट्या होऊन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते आणि बाळ निपचित पडले होते. त्याचबरोबर बाळाचा श्वासोच्छ्रुासही बंद पडला होता. बाळ कुठलीही हालचाल करत नसल्यामुळे परिवाराकडून राडाराडा सुरू झाली आणि अंत्यविधीची ही तयारीला सुरुवात झाली होती. मात्र परिवारातील नातेवाईकांनी नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपला अनुभव वापरत बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले.


त्यानंतर बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. सध्या बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवं जीवन देऊन गेला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये