Earthquake : कारगिल ते अरुणाचल प्रदेश हादरलं!

नवी दिल्ली : देशभरात होळीचा उत्सव साजरा होत असतानाच पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि कारगिलला भूकंपाचे हादरे बसले. कारगिल येथे रिश्टर स्केलवर ५ .२ आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ४ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने आपल्या ट्विटर हँडलवर (एक्स) दिली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार पहिला भूकंप उत्तर भारतात झाला. याचे केंद्रबिंदू लद्दाखच्या कारगिल परिसर होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर २. ५० वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिल भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५. २ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १५ किलोमीटर खोलीवर होते. भूकंप रात्री उशिरा झाला, त्यामुळे बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नव्हती. पण ज्यांना कळले, ते लगेच घराबाहेर निघाले. कारगिल परिसरात रात्रीचे तापमान खूपच कमी असल्याने, येथे अजूनही थंडी सुरूच आहे. त्यानंतर ४ तासांनी अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंगा येथे सकाळी ६ .१ वाजता भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र जमीनीपासून १० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या