Earthquake : कारगिल ते अरुणाचल प्रदेश हादरलं!

नवी दिल्ली : देशभरात होळीचा उत्सव साजरा होत असतानाच पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि कारगिलला भूकंपाचे हादरे बसले. कारगिल येथे रिश्टर स्केलवर ५ .२ आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ४ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने आपल्या ट्विटर हँडलवर (एक्स) दिली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार पहिला भूकंप उत्तर भारतात झाला. याचे केंद्रबिंदू लद्दाखच्या कारगिल परिसर होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर २. ५० वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिल भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५. २ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १५ किलोमीटर खोलीवर होते. भूकंप रात्री उशिरा झाला, त्यामुळे बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नव्हती. पण ज्यांना कळले, ते लगेच घराबाहेर निघाले. कारगिल परिसरात रात्रीचे तापमान खूपच कमी असल्याने, येथे अजूनही थंडी सुरूच आहे. त्यानंतर ४ तासांनी अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंगा येथे सकाळी ६ .१ वाजता भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र जमीनीपासून १० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,