टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे. या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्टीय चॅम्पियनशिप अथवा मालिका खेळणार नाहीत.

कर्णधार रोहित शर्मा भारताला ९ महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईत परतला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलआधी एक आठवड्याची विश्रांती मिळेल.

दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली. बीसीसीआयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही.

आयपीएलच्या महाकुंभमध्ये खेळणार खेळाडू


म्हणजेच खेळाडूंना आता श्वास घेण्यासही उसंत नाही. आता तो टी-२० क्रिकेटचा महाकुंभ म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलची सुरूवात २२ मार्चला होईल तर फायनल २५ मेला खेळवला जाईल.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी