टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे. या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्टीय चॅम्पियनशिप अथवा मालिका खेळणार नाहीत.

कर्णधार रोहित शर्मा भारताला ९ महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईत परतला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलआधी एक आठवड्याची विश्रांती मिळेल.

दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली. बीसीसीआयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही.

आयपीएलच्या महाकुंभमध्ये खेळणार खेळाडू


म्हणजेच खेळाडूंना आता श्वास घेण्यासही उसंत नाही. आता तो टी-२० क्रिकेटचा महाकुंभ म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलची सुरूवात २२ मार्चला होईल तर फायनल २५ मेला खेळवला जाईल.
Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा