भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी 'ரூ' चिन्ह लावले

चेन्नई : तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तामीळ विरुद्ध हिंदी हा भाषावाद आणखी तीव्र झाला आहे. तामीळनाडूत द्रमुक (इंडी आघाडी) सत्तेत आहे तर केंद्रात भाजपाच्या (एनडीए) नेतृत्वातले सरकार आहे. द्रमुक सरकारने भाषावादात स्वतःची भूमिका आणखी कठोर केली आहे. तामीळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या शुक्रवारी १४ मार्च रोजी जाहीर होणार असलेल्या २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे.



नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्रिभाषिक सूत्राद्वारे राज्यावर हिंदी लादल्याच्या आरोप करणाऱ्या तामीळनाडूतील द्रमुक सरकारने रुपयाचे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तामीळनाडू हे देशातील पहिले राज्य झाले आहे जिथे रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले आहे. स्टॅलिन सरकारने अद्याप अर्थसंकल्पातील बदल या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. पण भाजपाने तामीळनाडू सरकारच्या कृतीवर टीका केली आहे. द्रमुकच्या नेतृत्वातील तामीळनाडू सरकारची कृती ही भारतापासून वेगळे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली. भाषावाद निर्माण करुन द्रमुक स्वतःच्या अपयशांकडून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधू इच्छिते, अशीही शक्यता भाजपाने व्यक्त केली. तर तामीळ भाषेला प्राधान्य देण्यासाठी अर्थसंकल्पातून '₹' चिन्ह काढून टाकले आणि त्याऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे, असे द्रमुकचे नेते सरवनन अन्नादुराई म्हणाले. त्यांनी तामीळनाडू सरकारच्या कृतीत काहीही बेकायदा नसल्याचा दावा केला.



तामीळनाडूत २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात मुख्य लढत द्रमुक विरुद्ध अण्णाद्रमुक अशी आहे. पण भाजपा मागील काही काळापासून राज्यात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. ताजा भाषावाद निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या