Mineral Oil Reserves : मालवण, पालघरच्या समुद्रात सापडले खनिज तेलसाठे

सिंधुदुर्ग : मालवण येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१. ७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडले आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहे. तर या सगळ्या संशोधनाबाबत स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे.


समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत भारतात दिर्घकाळ संशोधन सुरु आहे. याचाच भाग म्हणून गेली आठ वर्षे अरबी समुद्रात संशोधन सुरु होते. यात आता १८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात ५३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १९ हजार १३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. हे साठे उथळ समुद्रात आहेत. त्यांचे किनाऱ्यापासूनचे अंतर ८६ सागरी मैल इतके आहे. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये तेलसाठे आढळल्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मालवणच्या खोल समुद्रात नवीन तेलसाठे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र, संबंधित विभागाकडून आपल्याकडे याबाबत कोणताही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतची अहवाल मिळताच सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल, असे वर्षा झालटे, तहसीलदार, मालवण यांनी सांगितले आहे.



अरबी समुद्रात तेलसाठ्यांसाठी अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर १९७४ मध्ये 'बॉम्बे हाय' या ठिकाणी खनिज तेलाचा साठा सापडला होता. त्या ठिकाणाहून सध्या तेल उत्खनन होत आहे. आताच्या या नव्या संशोधनामुळे महाराष्ट्रात तेल उत्पादन क्षेत्रात खूप मोठी भर पडेल.तसेच भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठ्यामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

शेअर बाजार गुंतवणूकदार आहात? मग एकाच ट्रेडिंग अँपवर सगळ काही भारतातील पहिला डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ लाँच

मोहित सोमण: देशात सध्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा विविध ग्राहक

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

भारत सरकारकडून सिडबीमध्ये ५००० कोटी रुपयांचे भांडवली गुंतवणूक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील विशाल सूक्ष्म, लघु आणि