Mineral Oil Reserves : मालवण, पालघरच्या समुद्रात सापडले खनिज तेलसाठे

सिंधुदुर्ग : मालवण येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१. ७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडले आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहे. तर या सगळ्या संशोधनाबाबत स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे.


समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत भारतात दिर्घकाळ संशोधन सुरु आहे. याचाच भाग म्हणून गेली आठ वर्षे अरबी समुद्रात संशोधन सुरु होते. यात आता १८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात ५३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १९ हजार १३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. हे साठे उथळ समुद्रात आहेत. त्यांचे किनाऱ्यापासूनचे अंतर ८६ सागरी मैल इतके आहे. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये तेलसाठे आढळल्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मालवणच्या खोल समुद्रात नवीन तेलसाठे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र, संबंधित विभागाकडून आपल्याकडे याबाबत कोणताही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतची अहवाल मिळताच सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल, असे वर्षा झालटे, तहसीलदार, मालवण यांनी सांगितले आहे.



अरबी समुद्रात तेलसाठ्यांसाठी अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर १९७४ मध्ये 'बॉम्बे हाय' या ठिकाणी खनिज तेलाचा साठा सापडला होता. त्या ठिकाणाहून सध्या तेल उत्खनन होत आहे. आताच्या या नव्या संशोधनामुळे महाराष्ट्रात तेल उत्पादन क्षेत्रात खूप मोठी भर पडेल.तसेच भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठ्यामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

एआयमुळे आयटीसह बँकिंग क्षेत्रात घालमेल? २०३० पर्यंत युरोपात २ लाख बँकेच्या कर्मचाऱ्यांना नारळ याचे लोण भारतात का पसरणार? वाचा..

मोहित सोमण: जगभरात एआय (Artificial Intelligence AI) पासून जगभरातील रोजगार निर्मितीला धोका आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत

भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या

अयोध्येत रामभक्तांची गर्दी

४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन लखनऊ : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात