Shreyas Iyer : तो भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज-अनिल कुंबळे

  87

मुंबई : माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारताचा सर्वात विश्वासार्ह एकदिवसीय फलंदाज म्हटले आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर कुंबळे यांनी विशेष प्रकाश टाकला आहे.


भारताने न्यूझीलंडला पराभूत करून २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकली आणि तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेवर नाव कोरले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)ने या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने पाच डावांत २४३ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सरासरी ४८.६० आणि स्ट्राईक रेट ७९.४१ होती.



ESPNcricinfo वरील संभाषणात कुंबळे यांनी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हटले आहे. ते म्हणाले, “हो, तो भारताचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. आम्ही हे विश्वचषकात आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाज सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे आणि श्रेयसने ही जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.”


कुंबळे यांनी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या मधल्या फळीत खेळण्याच्या भूमिकेचेही कौतुक केले. ते म्हणाले, “श्रेयसचे मुख्य काम डाव संपवणे नव्हे, तर मधल्या षटकांत डावावर नियंत्रण ठेवणे आहे. तो ३५ ते ४० व्या षटकापर्यंत संघाला स्थिर ठेवतो, ज्यामुळे केएल राहुल आणि हार्दिक पंड्यासारख्या फिनिशर्सला सामन्याचा शेवट करण्यासाठी आदर्श परिस्थिती मिळते.”


श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या प्रभावी भागीदाऱ्यांवरही कुंबळे यांनी भर दिला. त्यांनी सांगितले केले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीसोबत आणि अंतिम सामन्यात अक्षर पटेलसोबत श्रेयसने केलेल्या भागीदाऱ्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.


श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध ५६ आणि न्यूझीलंडविरुद्ध ७९ धावा करत त्याने भारताला मजबूत स्थितीत नेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ६२ चेंडूत ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र