Syed Abid Ali : भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन

सुनील गावसकरांकडूनही शोक व्यक्त


मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू सईद अबिद अली (Syed Abid Ali) यांचे बुधवारी (१२ मार्च) निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. ज्यावेळी फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जायचे, त्यावेळी वनडे क्रिकेटप्रमाणे त्यांची खेळण्याची शैली होती. ते उजव्या हाताने मध्यमगी गोलंदाजी करायचे. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही अफलातून हेते, तर तळात ते चांगली फलंदाजी करायचे.


९ सप्टेंबर १९४१ रोजी हैदराबादला जन्म झालेल्या सईद अबिद अली यांनी १९६७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी २९ कसोटी सामने खेळताना ४७ विकेट्स घेतल्या. त्यांनी १९७४ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ५ वनडे सामने खेळले असून ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी कसोटीत १०१८ धावाही केल्या, ज्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी एकूण २१२ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ८७३२ धावा केल्या आहेत. त्यांनी लिस्ट ए क्रिकेटचे १२ सामने खेळले, ज्यात १९ विकेट्स घेतल्या आणि १६९ धावा केल्या.



माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी लिहिले, ‘खूप दु:खद बातमी आहे. त्यांचं हृदय सिंहासारखं होतं. ते संघासाठी काहीही करायला तयार असायचे. जेव्हा गरज पडेल तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज असूनही त्यांनी सलामीलाही फलंदाजी केली. लेग कॉर्डनला आपल्या सर्वोत्तम फिरकी चौकडीच्या गोलंदाजीवर काही अफलातून झेल घेतले. जर मला नीट आठवत असेल, तर नवीन चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या सईद यांनी कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोनदा विकेट घेण्याचा अनोखा विक्रमही केला होता. त्यांना धावायला आवडायचे. माझ्या पदार्पणाच्या सामन्याच त्याला फलंदाजीत बढती मिळाल्यानंतर त्यांची ही रणनीती महत्त्वाची ठरली होती, ज्यामुळे काही ओव्हरथ्रोमुळे दबाव कमी झाला होता. ते जंटलमन होते.'

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता