Kalyan : १४ गावांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषद सीईओना आदेश


आमदार राजेश मोरे यांच्यासह विकास समितीने घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट


कल्याण : नवी मुंबई महापालिकेलगत असलेली १४ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावाचा विकास केला जावा यासाठी आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे (Rajesh more) यांनी विकास समिती सदस्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी १४ गावाच्या निधीबाबत सकारात्मकता दाखविताना या गावामधील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि जिल्हापरिषद सीईओ यांना दिले आहेत.


नवी मुंबई लगतची १४ गावे महापालिकेतून बाहेर काढण्याबाबत मंत्री गणेश नाईक (Ganesh naik) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना पत्र दिले आहे. मात्र या गावातील संघर्ष विकास समितीला ही गावे महापालिकेतच हवी असून याबाबत यापूर्वी देखील संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मागील वर्षीच्या मार्च महिन्यात ही गावे महापालिकेतच राहतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी आज झालेल्या बैठकीत केली. त्याचबरोबर या गावाचे दप्तर आजच्या आज ताब्यात घेत आयुक्तांनी या गावात सुरु असलेल्या विकास कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश आयुक्त कैलास शिंदे यांना दिले.



त्यानंतर लगेचच आमदार राजेश मोरे यांनी नवी मुंबई येथील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह १४ गाव संघर्ष समितीला सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली आणि १४ गावे नवी मुंबई महापालिकेत ठेवण्या संदर्भात पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख भरत भोईर, गणेश जेपाल, लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, सुखदेव पाटील, भरत काळू भोईर, लक्ष्मण येदरकर, चेतन पाटील, काळूराम पाटील, महादेव जाधव, मनोज पाटील हे विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.

Comments
Add Comment

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

MIM मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, एवढे उमेदवार रिंगणात उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच

Priyanka Chopra : अहा! हातात बंदूक अन् पायात कोल्हापुरी, काशीबाईनंतर प्रियांका चोप्राच्या मराठमोळ्या लूकने घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित

मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवासाचा नवा फंडा; UTS अॅपचा गैरवापर करून रेल्वेला लावला जातोय गंडा?

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी दररोजचा प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र काही हुशार प्रवाशांनी या

मुंबई लोकलमध्ये घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चगेट-बोरिवली