Mumbai Local Train : चालत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यावर फेकली दारूची बाटली! अल्पवयीन मुलगी जखमी

मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी म्हणजेच लोकल ट्रेन ही प्रत्येकाच्या आयुष्यातल्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. या लोकलवाहिनीने अनेक पिढ्या आणि त्यासोबत घडलेले अनेक प्रसंग पाहिले आहेत. लोकलवर दगडफेकीच्या घटना नित्याच्या झाल्याने रेल्वेने खिडक्यांवर जाळ्या बसवून घेतल्या. तरीही अधूनमधून दगडफेकीच्या घटना होत असतात. आता होळीच्या निमित्ताने पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी महिलांच्या डब्यात एक व्यक्ती नग्न अवस्थेत आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या जीवनवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळाच्या चालत्या लोकलमध्ये अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली. या घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली.



मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.११ मार्च) रोजी रात्री साधारण ८.३० वाजता टिटवाळा लोकलच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली. ही दारुची बाटली पहिल्यांदा ट्रेन मधील पंख्याला लागली त्यानंतर बाटलीचे तुकडे डब्यात सर्वत्र पसरले असून त्यातील एक तुकडा अल्पवयीन मुलीला लागला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, ट्रेन भरधाव वेगाने असताना ही बाटली नक्की कोणी आणि कुठून फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात