MNS Raj Thakrey : राज ठाकरेंचं वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे : भाजपा नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि आता तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे असल्याचे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारं आहे. हिंदू माणूस देव देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही आपण मानतो. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नये.



स्वच्छतेच्या मुद्द्यावर आम्हीही सहमत आहोत. राजीव गांधींपासून ते आजपर्यंत नद्या स्वच्छ झाल्या नाहीत, पण त्याच खापर काँग्रेसवर जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याला प्राधान्य दिले आहे. नदी जोड प्रकल्प सिंचन गाळमुक्त धरणं असे अभिनव उपक्रम त्यांनी आणल्याचे दरेकर म्हणाले. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करतंय. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करत आहे. स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीबाबत प्रचंड काम सुरू आहे. चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला हवं असेही दरेकर म्हणाले.



कुंभमेळा ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपण श्रद्धेवर जगत आहोत असेही दरेकर म्हणाले. यावेळी महापालिकेच्या बिलांच्याबाबत आम्ही कधी लक्ष घातलेले नाही, ज्यांच बिलांवर लक्ष असते ते बिलांच्या माध्यमातून मलिदा घेतात ते लक्ष ठेवतात असे दरेकर म्हणाले. सोन्यासारखी माणसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जपता आली नाहीत, त्यांनी सोन्याचा चमचा जपला असा टोला दरेकरांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेबांनी जी सोन्यासारखी माणसे जोडली ती यांनी टिकवली नाहीत, यांनी सोन्याच्या चमचावर लक्ष दिल्याचा टोला देखील दरेकरांनी नाव न घेता संजय राऊतांना लगावला.

Comments
Add Comment

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची

पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांत पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच