MNS Raj Thakrey : राज ठाकरेंचं वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे : भाजपा नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि आता तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे असल्याचे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारं आहे. हिंदू माणूस देव देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही आपण मानतो. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नये.



स्वच्छतेच्या मुद्द्यावर आम्हीही सहमत आहोत. राजीव गांधींपासून ते आजपर्यंत नद्या स्वच्छ झाल्या नाहीत, पण त्याच खापर काँग्रेसवर जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याला प्राधान्य दिले आहे. नदी जोड प्रकल्प सिंचन गाळमुक्त धरणं असे अभिनव उपक्रम त्यांनी आणल्याचे दरेकर म्हणाले. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करतंय. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करत आहे. स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीबाबत प्रचंड काम सुरू आहे. चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला हवं असेही दरेकर म्हणाले.



कुंभमेळा ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपण श्रद्धेवर जगत आहोत असेही दरेकर म्हणाले. यावेळी महापालिकेच्या बिलांच्याबाबत आम्ही कधी लक्ष घातलेले नाही, ज्यांच बिलांवर लक्ष असते ते बिलांच्या माध्यमातून मलिदा घेतात ते लक्ष ठेवतात असे दरेकर म्हणाले. सोन्यासारखी माणसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जपता आली नाहीत, त्यांनी सोन्याचा चमचा जपला असा टोला दरेकरांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेबांनी जी सोन्यासारखी माणसे जोडली ती यांनी टिकवली नाहीत, यांनी सोन्याच्या चमचावर लक्ष दिल्याचा टोला देखील दरेकरांनी नाव न घेता संजय राऊतांना लगावला.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.