मुंबईतील मरोळमध्ये वाहनांना आग, तीन गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे आग लागली. ही आग लागल्यामुळे जवळच उभी असलेली वाहने जळून खाक झाली. यात एक कार, एक रिक्षा आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. दुर्घटनेत तीन नागरिक भाजले आहेत. भाजलेल्या तीन जणांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भाजलेल्यांमध्ये दोन २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत आणि एक ५२ वर्षांचा रिक्षाचालक आहे. सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधितांच्या नातलगांना माहिती देण्यात आली आहे.





गॅस गळतीमुळे रविवारी ९ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करुन नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील संकट टळले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अरविंदकुमार कैथल - वय २१ - दुचाकीवर - ३० ते ४० टक्के भाजले
अमन हरिशंकर सरोज - वय २२ - दुचाकीवर - ४० ते ५० टक्के भाजले
सुरेश कैलास गुप्ता - वय ५२ - रिक्षा चालक - कंबरेखाली २० टक्के भाजले
Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे