मुंबईतील मरोळमध्ये वाहनांना आग, तीन गंभीर जखमी

मुंबई : मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे आग लागली. ही आग लागल्यामुळे जवळच उभी असलेली वाहने जळून खाक झाली. यात एक कार, एक रिक्षा आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. दुर्घटनेत तीन नागरिक भाजले आहेत. भाजलेल्या तीन जणांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भाजलेल्यांमध्ये दोन २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत आणि एक ५२ वर्षांचा रिक्षाचालक आहे. सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधितांच्या नातलगांना माहिती देण्यात आली आहे.





गॅस गळतीमुळे रविवारी ९ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करुन नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील संकट टळले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अरविंदकुमार कैथल - वय २१ - दुचाकीवर - ३० ते ४० टक्के भाजले
अमन हरिशंकर सरोज - वय २२ - दुचाकीवर - ४० ते ५० टक्के भाजले
सुरेश कैलास गुप्ता - वय ५२ - रिक्षा चालक - कंबरेखाली २० टक्के भाजले
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती