ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाने रचला इतिहास, जिंकला चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब

  327

दुबई: दुबईच्या मैदानावर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवत खिताब पटकावला आहे. न्यूझीलंडने फायनल सामन्यात भारताला विजयासाठी २५२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताने हे आव्हान बॉल राखत तसेच ४ विकेट राखत पूर्ण केले.


भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने सगळ्यात आधी २००२मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा त्यांनी श्रीलंकेसह संयुक्तपणे खिताब जिंकला होता. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने इतिहास रचला आहे.



रोहितची तुफानी खेळी, श्रेयस-राहुलची संयमी खेळी


लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहित शर्मा आक्रमक अंदाजात दिसला. रोहितने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ ४१ बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली. गिलने १ षटकाराच्या मदतीने ५० बॉलमध्ये ३१ धावा केल्या. यानंतर विराट कोहलीने स्वस्तात विकेट गमावली. त्याने केवळ १ धाव केली.


त्यानंतर संघाने रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने ८३ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद १२२ होती. रोहित बाद झाल्यानंतर अक्षऱ पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सांभाळले. श्रेयसने ६२ बॉलमध्ये ४८ धावा केल्या. तर अक्षर पटेलने २९ धावांवर आपली विकेट गमावली.


तत्पूर्वी, न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या.


न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने यादरम्यान ३ षटकार ठोकले. तर मिचेल ब्रासवेलने नाबाद ५३ धावा ठोकल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक झालेले असताना त्यांनी पहिला विकेट गमावला. त्यानंतर दोन विकेट झटपट गमावल्यानंतर न्यूझीलंडने सावरले. डॅरेल मिचेलने डाव सावरला. एकीकडे विकेट पडत होत्या. मात्र डॅरेल मिचेल आणि ब्रासवेलने संयमी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण