मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना ‘मी टू’ प्रकरणी कोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीवरील लैंगिक छळाच्या आरोपाखाली पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी नाना पाटेकर दोषी ठरण्यापासून वाचले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पाटेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. तर तिने त्यांच्यावर गंभीर आरोप करत अंधेरी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप लावला होता. याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. यावर न्याय दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी पाटेकरांची बाजू मांडली. तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. तर मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट देखील फेटाळल्याने पाटेकरांना दिलासा मिळाला आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्स सिक्वेन्सवेळी लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला. या आरोपाखाली तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल केली. याचआधारे पोलिसांनी पाटेकरांवर मी टू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला. तनुश्री दत्ताने मी टू मोहिमेचा मुद्दा गिरवत पाटेकरांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. तिने असा दावा केला होता की, २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या फिल्मच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी तिचा लैंगिक छळ केला. तर सिंगर आणि अॅक्टरची शुटिंग चालू असण्याच्या दरम्यान देखील त्यांनी वारंवार सेटवर येत होते. मात्र कोर्टाने हे आरोप फेटाळून लावत पाटेकरांना दिलासा दिला आहे. परंतु तनुश्रीच्या वकिलांनी हे नाकारले आहे. ते म्हणाले की, बी रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेत्रीने केवळ नाना पाटेकरच नाही तर कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावरही आरोप केले होते.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…