Nana Patekar : नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी मोठा दिलासा

  49

मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना 'मी टू' प्रकरणी कोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीवरील लैंगिक छळाच्या आरोपाखाली पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी नाना पाटेकर दोषी ठरण्यापासून वाचले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पाटेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. तर तिने त्यांच्यावर गंभीर आरोप करत अंधेरी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप लावला होता. याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. यावर न्याय दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी पाटेकरांची बाजू मांडली. तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. तर मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट देखील फेटाळल्याने पाटेकरांना दिलासा मिळाला आहे.



अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्स सिक्वेन्सवेळी लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला. या आरोपाखाली तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल केली. याचआधारे पोलिसांनी पाटेकरांवर मी टू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला. तनुश्री दत्ताने मी टू मोहिमेचा मुद्दा गिरवत पाटेकरांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. तिने असा दावा केला होता की, २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या फिल्मच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी तिचा लैंगिक छळ केला. तर सिंगर आणि अॅक्टरची शुटिंग चालू असण्याच्या दरम्यान देखील त्यांनी वारंवार सेटवर येत होते. मात्र कोर्टाने हे आरोप फेटाळून लावत पाटेकरांना दिलासा दिला आहे. परंतु तनुश्रीच्या वकिलांनी हे नाकारले आहे. ते म्हणाले की, बी रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेत्रीने केवळ नाना पाटेकरच नाही तर कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावरही आरोप केले होते.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी