रामेश्वरम : तामिळनाडूच्या पांबन भागात मारेमारी करणाऱ्या १४ भारतीय मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. सीमापार मासेमारी केल्याचा आरोप करीत श्रीलंकेचे नौदल या मासेमारांना मन्नार नाविक तळावर घेऊन गेल्याची माहिती रामेश्वरम मासेमार संघटनेने दिली.
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी बेट समुद्र सीमा ओलांडल्याचा आरोप करत ३२ भारतीय मासेमारांना अटक करून ५ बोटी जप्त केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा १४ जणांना अटक करण्यात आलीय. यावर्षी श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत १५० भारतीय मासेमारांना अटक करून १८ बोटी जप्त केल्या आहेत.
मासेमारीवरून भारत-श्रीलंका यांच्यात बरेचदा वादावादी होत असून श्रीलंकेच्या नौदलाचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्याची विनंती केली आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…