Pandharpur : भयानक! विठुरायाच्या पंढरीत तब्बल १४७ किलो गांजासह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : कारमधून १४७ किलो गांजासह ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भटुंबरे (ता. पंढरपूर) परिसरातील अहिल्यादेवी चौकात करण्यात आली. याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील तिघांविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


गुरसाळेकडून (ता. पंढरपूर) पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या एका कारमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी केली. नाकाबंदी कारवाईवेळी गुरसाळेतून अहिल्यादेवी चौकात एक संशयित कार पोलिसांनी अडवली.



वाहनाच्या तपासणीप्रसंगी त्या वाहनातील प्रदीप दत्तात्रय हिवरे (वय २०, रा. पुरंदावडे, ता. माळशिरस) याच्याकडे विचारपूस केली. या कारमध्ये आंबट उग्र वासाचा तीन पोती गांजा ७२ पाकिटांमध्ये पॅक करण्यात आलेला १४७ किलो ग्रॅम वजनाचा गांजा व कार (एमएच १२- एचव्ही ५६६६) असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या