बार्बाडोसकडून मिळालेल्या सर्वोच्च सन्मानासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार, पुरस्कार भारतीयांना समर्पित

बार्बाडोस : कोविड काळात भारताने दिलेली मदत आणि पाठिंबा याची जाणीव ठेवून बार्बाडोस सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा जाहीर गौरव केला. पंतप्रधान मोदी यांच्यावतीने 'ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस' हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले. बार्बाडोस सरकारने दिलेला पुरस्कार म्हणजे कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदी यांनी बार्बाडोसचे आभार मानले.





बार्बाडोसचे पंतप्रधान अमोर मोटले यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी गुयानातील जॉर्जटाउनमध्ये भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला.



कोविड-१९ साथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि मौल्यवान मदतीसाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे बार्बाडोस सरकारने जाहीर केले. महामारी काळात मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्यामुळे बार्बाडोसला या संकटातून सावरण्यास मदत मिळाली, असेही बार्बाडोस सरकारने सांगितले.

पंतप्रधान मोदींच्यावतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाबित्रा मार्गेरिटा यांनी बार्बाडोस सकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असे पाबित्रा मार्गेरिटा यांनी सांगितले.
Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल