Western Railway : आठवड्यातून दोनदा मुंबई सेंट्रल ते दिल्लीदरम्यान धावणार विशेष गाडी!

मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळी आणि उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल आणि दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन वेळा अतिजलद वातानुकूलित विशेष गाडी चालवणार आहे.



गाडी क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-दिल्ली (आठवड्यातून दोन वेळा)अतिजलद वातानुकूलित विशेष क्रमांक ०९००३ मुंबई सेंट्रल-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल. ही गाडी ७ ते २८ मार्च पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९००४ दिल्ली-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल दर बुधवार आणि शनिवारी दिल्लीहून दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ८ ते २९ मार्च पर्यंत धावेल.


ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, फालना, मारवाड, बेवार,अजमेर,किशनगढ,जयपूर, गांधीनगर जयपूर, बंदिकुई, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कॅन्ट स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या गाडीला एसी २-टियर,एसी ३-टियर कोच असतील.

Comments
Add Comment

Legislative Council Elections : विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांकडून ‘वेट अँड वॉच’

अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक; बच्चू कडूंच्या नावावरून शिवसेनेत अंतर्गत विरोध मुंबई : राज्यातील विधान

ILS Law College : पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयाला दणका

 बेकायदा शुल्क व्याजासह परत करण्याचे आदेश; चौकशी समितीच्या अहवालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही