Western Railway : आठवड्यातून दोनदा मुंबई सेंट्रल ते दिल्लीदरम्यान धावणार विशेष गाडी!

मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळी आणि उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल आणि दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन वेळा अतिजलद वातानुकूलित विशेष गाडी चालवणार आहे.



गाडी क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-दिल्ली (आठवड्यातून दोन वेळा)अतिजलद वातानुकूलित विशेष क्रमांक ०९००३ मुंबई सेंट्रल-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल. ही गाडी ७ ते २८ मार्च पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९००४ दिल्ली-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल दर बुधवार आणि शनिवारी दिल्लीहून दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ८ ते २९ मार्च पर्यंत धावेल.


ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, फालना, मारवाड, बेवार,अजमेर,किशनगढ,जयपूर, गांधीनगर जयपूर, बंदिकुई, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कॅन्ट स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या गाडीला एसी २-टियर,एसी ३-टियर कोच असतील.

Comments
Add Comment

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल