Western Railway : आठवड्यातून दोनदा मुंबई सेंट्रल ते दिल्लीदरम्यान धावणार विशेष गाडी!

  56

मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि होळी आणि उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल आणि दिल्ली दरम्यान आठवड्यातून दोन वेळा अतिजलद वातानुकूलित विशेष गाडी चालवणार आहे.



गाडी क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-दिल्ली (आठवड्यातून दोन वेळा)अतिजलद वातानुकूलित विशेष क्रमांक ०९००३ मुंबई सेंट्रल-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई सेंट्रलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल. ही गाडी ७ ते २८ मार्च पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०९००४ दिल्ली-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल दर बुधवार आणि शनिवारी दिल्लीहून दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी ८ ते २९ मार्च पर्यंत धावेल.


ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, फालना, मारवाड, बेवार,अजमेर,किशनगढ,जयपूर, गांधीनगर जयपूर, बंदिकुई, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कॅन्ट स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या गाडीला एसी २-टियर,एसी ३-टियर कोच असतील.

Comments
Add Comment

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या