ICC Champions Trophy 2025: २५ वर्षांपूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगला होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना, किवी संघाने मारली होती बाजी

मुंबई: २००० या सालानंतर पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy 2025) स्पर्धेचा फायनल सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यान ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. जेव्हा दोन्ही संघ शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते तेव्हा टीम इंडियाला हरवत किवी संघाने खिताब जिंकला होता.


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५सेमीफायनलमध्ये(ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये सामील होते. ग्रुप स्टेजमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले होते.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०००च्या फायनलमध्ये आमनेसामने होते भारत आणि न्यूझीलंड


चॅम्पियन्स ट्रॉफीचा(ICC Champions Trophy 2025) दुसरा हंगाम २०००मध्ये केनियामध्ये आयोजित करण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. किवी संघ भारताला फायनलमध्ये हरवत चॅम्पियन बनले होते. येथे भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता तर प्लेईंग ११मध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, झहीर खान यासारखे खेळाडू होते.


तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावांचा स्कोर केला होता. कर्णधार गांगुलीने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, इतर फलंदाज चांगली खेळी करू शकले नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघातील क्रिस केर्न्सने १०२ धावा तडकावल्या होत्या. न्यूझीलंडने २ बॉल आणि ४ विकेट राखत आव्हान गाठले होते.


आता २५ वर्षांनी या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात भारतीय संघ किवी संघाला हरवत जेतेपद मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. दरम्यान, यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास न्यूझीलंडसमोर त्यांचे पारडे जड वाटते.

Comments
Add Comment

विराट आणि रोहित २०२७ विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील - ट्रॅव्हिस हेड

कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि

टीम इंडियाच्या 'अपोलो टायर्स' जर्सीचा लूक समोर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पर्थमध्ये फोटोशूट

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या

India-Australia ODI XI : कमिन्सची ऑल-टाईम टीम जाहीर! रोहित-विराटला नाही स्थान; पॅट कमिन्सच्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका (ODI Series) १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार

FIFA World Cup 2026 : ४८ संघ घेणार फुटबॉलच्या महासंग्राममध्ये सहभाग, या संघांनी केले क्वालिफाय

मुंबई: फिफा विश्वचषक २०२६ फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. कारण, यावेळी प्रथमच या स्पर्धेत

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार