ICC Champions Trophy 2025: २५ वर्षांपूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगला होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना, किवी संघाने मारली होती बाजी

मुंबई: २००० या सालानंतर पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy 2025) स्पर्धेचा फायनल सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यान ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. जेव्हा दोन्ही संघ शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते तेव्हा टीम इंडियाला हरवत किवी संघाने खिताब जिंकला होता.


चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५सेमीफायनलमध्ये(ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये सामील होते. ग्रुप स्टेजमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले होते.



चॅम्पियन्स ट्रॉफी २०००च्या फायनलमध्ये आमनेसामने होते भारत आणि न्यूझीलंड


चॅम्पियन्स ट्रॉफीचा(ICC Champions Trophy 2025) दुसरा हंगाम २०००मध्ये केनियामध्ये आयोजित करण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. किवी संघ भारताला फायनलमध्ये हरवत चॅम्पियन बनले होते. येथे भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता तर प्लेईंग ११मध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, झहीर खान यासारखे खेळाडू होते.


तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावांचा स्कोर केला होता. कर्णधार गांगुलीने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, इतर फलंदाज चांगली खेळी करू शकले नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघातील क्रिस केर्न्सने १०२ धावा तडकावल्या होत्या. न्यूझीलंडने २ बॉल आणि ४ विकेट राखत आव्हान गाठले होते.


आता २५ वर्षांनी या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात भारतीय संघ किवी संघाला हरवत जेतेपद मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. दरम्यान, यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास न्यूझीलंडसमोर त्यांचे पारडे जड वाटते.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक