माटुंगा रेल्वे स्थानक, फुल बाजार परिसरातील अतिक्रमणांचा विळखा सुटला

तब्बल २२ अनधिकृत,३० अतिक्रमण केलेल्या दुकानांवरही कारवाई


मुंबई : माटुंगा मध्य रेल्वे स्थानक परिसर आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने गुरुवारी ०६ मार्च २०२५ कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत २२ दुकाने आणि अतिक्रमण केलेल्या ३० दुकांनाचा समावेश आहे.


उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते.



या पार्श्वभूमीवर, एफ (उत्तर) विभागाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत सुमारे ३०० मीटर परिसरातील अनधिकृत २२ दुकाने तसेच अतिक्रमण करण्यात आलेली ३० दुकाने निष्कासित करण्यात आली. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सुमारे १०५ मनुष्यबळासह २ जेसीबी व ६ डंपर आणि २ अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.


महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदाची प्रथच सुत्रे हाती घेतल्यानंतर शुक्ला यांनी माटुंगा रेल्वे स्टेशन परिसरासह येथील भांडारकर मार्गावरील फुलबाजारातील गाळेधारकांना लक्ष्य केल्याने आता हे सहायक आयुक्त आता विभागातील कुठल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून लक्ष वेधून घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील